शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रेयसीच्या घरात प्रियकराचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:00 IST

प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

राहुरी : प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या पे्रयसीला अटक केली आहे़ तालुक्यातील मानोरी येथे १५ जून रोजी दुपारी ही घटना घडली़शरद सर्जेराव चव्हाण (वय ३१ रा़ बºहाणपूर ता़ नेवासा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ या घटनेनंतर मयताचा भाऊ संतोष उर्फ सतिश सर्जेराव चव्हाण (वय २८) याने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मयत भाऊ शरद चव्हाण हा शिर्डी-शिंगणापूर रोडवर वाहनचालक म्हणून काम करतो़ शरद याचे गेल्या तीन वर्षांपासून नंदिनी (रा़ मानोरी) नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. सदर मुलीने शरद यांचे विरुध्द पूर्वी अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली होती़ त्यानंतर नंदिनी ही आमच्या घरी येऊन आम्हास शिवीगाळ करून बदनामी करत होती. तसेच हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी ती आमच्या कुटुंबीयांकडून दीड लाख रूपयांची मागणी करत होती. तेव्हा माझी आई सरस्वती यांनी सन २०१८ रोजी नंदिनी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ती माझा मयत भाऊ शरद चव्हाण यास वारंवार फोन करुन त्यास पैशाची मागणी करून सोबत रहा असा आग्रह धरत होती़ तसेच घरी येऊन त्रास देत होती़ या कारणामुळे शरद हा तिचेसोबत शिर्डी येथे तीन वर्षांपासून राहत होता़ तो घरी आला की, नंदिनी मला खूप त्रास देत आहे़ पैशांसाठी आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, असे सांगत असे़दिनांक १५ जून रोजी दुपारचे सुमारास राहुरी पोलीस ठाणे येथून फोन आला व त्यांनी सांगितले की, तुमचा मुलगा शरद याने मानोरी येथे नंदिनी हिचे मानोरी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी नंदिनीवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक गणेश शेळके हे पुढील तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे़प्रेमप्रकरणातून मुलाची आत्महत्याश्रीगोंदा : बांगर्डे येथील अजित शेळके या विद्यार्थ्याने प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ एप्रिलला घडली होती. तब्बल महिनाभरानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत अजितचे वडील संजय धोंडिबा गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित हा घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याचे गावातील एका मुलीशी सूत जुळले होते. दीड महिन्यांपूर्वी अजितला मुलीच्या वडिलांनी दमबाजी केली होती. त्यामुळे त्याने घाबरून आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस