शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो : वर्षभर व्हॅलेंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:07 IST

प्रेमाला अंत नाही,

प्रेमाला अंत नाही, व्यक्त करण्यासाठी कुठल्या एका दिवसाची गरजही नाही. ती चिरतरूण आणि आयुष्यभर मनात घर करून राहणारी भावना आहे. शेवटपर्यंत निभावले जाते तेच खरेखुरे प्रेम ठरते, अशी भावना येथील संजय छल्लारे व स्वाती छल्लारे या प्रेमवीर दाम्पत्याने व्यक्त केली. तीस वर्षांनंतरही वैैवाहिक जीवनात आमच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असतो, अशी मिश्किल भावनाही त्यांनी बोलून दाखविली.व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रतिक्रिया घेतली असता दोघांनीही मनमोकळेपणाने आपले अनुभव मांडले. प्रेमाला व प्रेम विवाहाला पूर्वी फार टोकाचा विरोध असायचा. नातेवाईक मंडळी जातीत व नात्यात ठरवून विवाह लावत. आपण मात्र ही चाकोरी मोडली. हा निर्णय घेतल्याचा आपल्याला आजही अभिमान असल्याचे दोघांनीही ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आता सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी सहज-सोप्पी माध्यमं उपलब्ध आहेत. आमच्या वेळी मात्र मोबाईल नव्हते. कॉलेज व्यतिरिक्त भाजी मंडई, यात्रौत्सव ही भेटण्याची ठिकाणं होती. भावना व्यक्त करण्यासाठी केवळ चिठ्ठीचाच आधार घेत. अगदी ती वाचण्यासाठीही मोकळी जागा मिळायची नाही. एक मात्र खरे, चिठ्ठीत मनातील भावना व्यक्त करण्यासाठी फार विचारपूर्वक लिहावे लागते. विचार करूनच बोलावे लागते. त्यामुळे त्यात अधिक खरेपणा होता. तो हल्ली तितकासा पहायला मिळत नाही. आम्हाला त्यावेळी व्हॅलेंटाइन डे काय असतो हेही माहित नव्हतं. मनातील नि:स्वार्थ प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही डेची गरज नसते.प्रेम विवाह केल्यामुळे लोकांचं अधिकच लक्ष रहायचं. मात्र, जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर प्रेम विवाहाखेरीज पर्याय नाही, असे छल्लारे दाम्पत्यानी सांगितले.प्रेम हे आंधळं असतं म्हणतात. मात्र ते डोळे झाकून कोणीही करू नये. विशेषत: मुलींना काळजी घ्यावी. आपले भविष्य अडचणीत सापडणार नाही हे पहायला हवे. ते निभावता आले पाहिजे, असे संजय व स्वाती छल्लारे म्हणाले.- शिवाजी पवार, श्रीरामपूर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर