शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो : वर्षभर व्हॅलेंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:07 IST

प्रेमाला अंत नाही,

प्रेमाला अंत नाही, व्यक्त करण्यासाठी कुठल्या एका दिवसाची गरजही नाही. ती चिरतरूण आणि आयुष्यभर मनात घर करून राहणारी भावना आहे. शेवटपर्यंत निभावले जाते तेच खरेखुरे प्रेम ठरते, अशी भावना येथील संजय छल्लारे व स्वाती छल्लारे या प्रेमवीर दाम्पत्याने व्यक्त केली. तीस वर्षांनंतरही वैैवाहिक जीवनात आमच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असतो, अशी मिश्किल भावनाही त्यांनी बोलून दाखविली.व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रतिक्रिया घेतली असता दोघांनीही मनमोकळेपणाने आपले अनुभव मांडले. प्रेमाला व प्रेम विवाहाला पूर्वी फार टोकाचा विरोध असायचा. नातेवाईक मंडळी जातीत व नात्यात ठरवून विवाह लावत. आपण मात्र ही चाकोरी मोडली. हा निर्णय घेतल्याचा आपल्याला आजही अभिमान असल्याचे दोघांनीही ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आता सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी सहज-सोप्पी माध्यमं उपलब्ध आहेत. आमच्या वेळी मात्र मोबाईल नव्हते. कॉलेज व्यतिरिक्त भाजी मंडई, यात्रौत्सव ही भेटण्याची ठिकाणं होती. भावना व्यक्त करण्यासाठी केवळ चिठ्ठीचाच आधार घेत. अगदी ती वाचण्यासाठीही मोकळी जागा मिळायची नाही. एक मात्र खरे, चिठ्ठीत मनातील भावना व्यक्त करण्यासाठी फार विचारपूर्वक लिहावे लागते. विचार करूनच बोलावे लागते. त्यामुळे त्यात अधिक खरेपणा होता. तो हल्ली तितकासा पहायला मिळत नाही. आम्हाला त्यावेळी व्हॅलेंटाइन डे काय असतो हेही माहित नव्हतं. मनातील नि:स्वार्थ प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही डेची गरज नसते.प्रेम विवाह केल्यामुळे लोकांचं अधिकच लक्ष रहायचं. मात्र, जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर प्रेम विवाहाखेरीज पर्याय नाही, असे छल्लारे दाम्पत्यानी सांगितले.प्रेम हे आंधळं असतं म्हणतात. मात्र ते डोळे झाकून कोणीही करू नये. विशेषत: मुलींना काळजी घ्यावी. आपले भविष्य अडचणीत सापडणार नाही हे पहायला हवे. ते निभावता आले पाहिजे, असे संजय व स्वाती छल्लारे म्हणाले.- शिवाजी पवार, श्रीरामपूर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर