शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

प्रेमासाठी ‘एकच’ दिवस नसतो : वर्षभर व्हॅलेंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:07 IST

प्रेमाला अंत नाही,

प्रेमाला अंत नाही, व्यक्त करण्यासाठी कुठल्या एका दिवसाची गरजही नाही. ती चिरतरूण आणि आयुष्यभर मनात घर करून राहणारी भावना आहे. शेवटपर्यंत निभावले जाते तेच खरेखुरे प्रेम ठरते, अशी भावना येथील संजय छल्लारे व स्वाती छल्लारे या प्रेमवीर दाम्पत्याने व्यक्त केली. तीस वर्षांनंतरही वैैवाहिक जीवनात आमच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असतो, अशी मिश्किल भावनाही त्यांनी बोलून दाखविली.व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रतिक्रिया घेतली असता दोघांनीही मनमोकळेपणाने आपले अनुभव मांडले. प्रेमाला व प्रेम विवाहाला पूर्वी फार टोकाचा विरोध असायचा. नातेवाईक मंडळी जातीत व नात्यात ठरवून विवाह लावत. आपण मात्र ही चाकोरी मोडली. हा निर्णय घेतल्याचा आपल्याला आजही अभिमान असल्याचे दोघांनीही ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आता सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी सहज-सोप्पी माध्यमं उपलब्ध आहेत. आमच्या वेळी मात्र मोबाईल नव्हते. कॉलेज व्यतिरिक्त भाजी मंडई, यात्रौत्सव ही भेटण्याची ठिकाणं होती. भावना व्यक्त करण्यासाठी केवळ चिठ्ठीचाच आधार घेत. अगदी ती वाचण्यासाठीही मोकळी जागा मिळायची नाही. एक मात्र खरे, चिठ्ठीत मनातील भावना व्यक्त करण्यासाठी फार विचारपूर्वक लिहावे लागते. विचार करूनच बोलावे लागते. त्यामुळे त्यात अधिक खरेपणा होता. तो हल्ली तितकासा पहायला मिळत नाही. आम्हाला त्यावेळी व्हॅलेंटाइन डे काय असतो हेही माहित नव्हतं. मनातील नि:स्वार्थ प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही डेची गरज नसते.प्रेम विवाह केल्यामुळे लोकांचं अधिकच लक्ष रहायचं. मात्र, जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर प्रेम विवाहाखेरीज पर्याय नाही, असे छल्लारे दाम्पत्यानी सांगितले.प्रेम हे आंधळं असतं म्हणतात. मात्र ते डोळे झाकून कोणीही करू नये. विशेषत: मुलींना काळजी घ्यावी. आपले भविष्य अडचणीत सापडणार नाही हे पहायला हवे. ते निभावता आले पाहिजे, असे संजय व स्वाती छल्लारे म्हणाले.- शिवाजी पवार, श्रीरामपूर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर