शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

माळीणच्या उदरात आजोळ हरवलं

By admin | Updated: August 10, 2014 23:28 IST

शिर्डी : निसर्गाची मुक्त उधळण करीत असलेलं देखणं गाव माळीण, निसर्गाने आपल्या कवेत घेऊन क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलं़

शिर्डी : निसर्गाची मुक्त उधळण करीत असलेलं देखणं गाव माळीण, निसर्गाने आपल्या कवेत घेऊन क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलं़ या दुर्घटनेत १५२ नागरिक काळाच्या उदरात गडप झाले़ याबरोबरच अनेक नातीही थिजून गेली़ राजू शिंगाडे या तरुणाचे आजोळही या घटनेत हरवून गेल़ंराजू शिंगाडे हा तरुण शिर्डी नगरपंचायतमध्ये संगणक अभियंता आहे़ अगदी लहानपणापासून आजोळाशी जोडलेल्या आठवणींचं भेडोंळे उलगडतांना राजूचे अश्रूही सुकून गेलेत़ त्याने या दुर्घटनेत आजी, मामाचा मुलगा व चुलत मामाच्या कुटुंबासह नऊ जणांना गमावलं आहे़ त्याचं गाव वचपे. माळीण या आजोळच्या गावापासून अवघ्या तीन-चार किलोमीटर अंतरावर डिंबे धरणाच्या कडेवर बसलेलं़ माळीणमध्ये त्याची वृद्ध आजी व चुलत मामांचे कुटुंब राहत होते़ त्या कुटुंबातील अन्यजन पुण्यात स्थायिक झाले आहेत. सणासुदीला किंवा शेतीच्या कामाला घरी येणं होई़ घटनेच्या दोनच दिवस अगोदर मामाचा पदवीधर असलेला मुलगा जितेंद्र लेंभे हा पुण्यावरून भात आवणीच्या कामाला आला होता़ तो नेहमी मारुती मंदिरात झोपायला असे़ दिवसभरच्या कामानंतर घटनेच्या दिवशी मात्र तो घरीच झोपला होता़ चुलत मामा दुंडाजी लेंभे शेतावर गेल्याने वाचले़आजी बबाबाई व चुलत मामाच्या सहा मुली, मुलगा काळाने हिरावून नेले़राजूची आजी डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या पहिल्या आळीत एका कौलारू घरात राहत होती़ प्रथम हीच आळी दरडीखाली गडप झाली़ पावसाळ्यात या गावाचं देखणेपणं खुलून येई, येथे झालेली मामांच्या मुलींची लग्ने,सणासुदीला जाणं-येणं, दिवाळी, उन्हाळी सुट्टयातील वास्तव्य, आंबे, करवंदे गोळा करणे, ओेढ्यावर आंघोळीला जाणे, या आठवणीं संपता संपत नाहीत़ विशेष म्हणजे जितेंद्र राजूचा समवयस्क असल्याने राजू गावी असेल तेव्हा आजोळीच राही़ तेथील आठवणी, आनंदाने व्यतित केलेले क्षण आता केवळ इतिहासजमा झालेत, उरल्या केवळ हृदयाला पीळ पाडणाऱ्या आठवणी़(प्रतिनिधी)