शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

कृषी कायद्यांविरुद्ध दीर्घकाळ लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

येथील शासकीय विश्रामगृहावर श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नठ ...

येथील शासकीय विश्रामगृहावर श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नठ बोलत होते. अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ. राजाराम सिंग, बिहारचे आमदार सुदामा प्रसाद, सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटक कॉ. किशोर ढमाले, सचिव करणसिंग कोकणी, श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. बाळासाहेब सुरुडे, जीवन सुरुडे उपस्थित होते.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात प्रथमच देशातील शेतकरी सर्वांना संघटित करत आहे. हे कायदे मागे घेण्यासाठी २७ सप्टेंबरला देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने तो निश्चितच यशस्वी होईल, अशी अपेक्षा नठ यांनी व्यक्त केली.

राजाराम सिंग म्हणाले, उत्पादन, साठवणूक व वितरणावर काॅर्पोरेट घराण्यांच्या मक्तेदारीला केंद्र सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. काही उद्योगपतींनी आधी गोदामे तयार केली व नंतर कायदे बनविले गेल्याचे निदर्शनास आले आहे. यातून एकच सिद्ध होते की, हे सर्व उद्योग जगतासाठी सुरू आहे. ज्या दिवशी धान्याचा बाजार कॉर्पोरेट जगताच्या ताब्यात जाईल, त्यावेळी पेट्रोल-डिझेल प्रमाणे दररोज अन्नधान्याचे दर वाढतील. त्यामुळे वेळीच कायद्यांना विरोध करण्याची आवश्यकता आहे.

सरकार व आंदोलकांमध्ये फक्त एका फोनचे अंतर असल्याचे बोलले जाते. मात्र, पंधरा लाख रुपयांच्या आश्वासनाप्रमाणेच तो एक जुमला आहे. देशाची अर्थव्यवस्था उणे २० टक्केपर्यंत खाली गेली होती. केवळ कृषी क्षेत्रात तीन टक्के वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००८ मध्ये कृषी क्षेत्राने भारताला मंदीपासून वाचविल्याचे स्पष्ट केले होते. ही शेतकऱ्यांची ताकद आहे, असे सिंग म्हणाले.

भाजपचे काही खासदार व त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल शेतकरी आंदोलनाविषयी बोलत आहेत. आरएसएसच्या भारतीय किसान संघानेही धरणे दिले आहे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

----------