शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

कृषी कायद्यांविरुद्ध दीर्घकाळ लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

येथील शासकीय विश्रामगृहावर श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नठ ...

येथील शासकीय विश्रामगृहावर श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नठ बोलत होते. अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ. राजाराम सिंग, बिहारचे आमदार सुदामा प्रसाद, सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटक कॉ. किशोर ढमाले, सचिव करणसिंग कोकणी, श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. बाळासाहेब सुरुडे, जीवन सुरुडे उपस्थित होते.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात प्रथमच देशातील शेतकरी सर्वांना संघटित करत आहे. हे कायदे मागे घेण्यासाठी २७ सप्टेंबरला देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने तो निश्चितच यशस्वी होईल, अशी अपेक्षा नठ यांनी व्यक्त केली.

राजाराम सिंग म्हणाले, उत्पादन, साठवणूक व वितरणावर काॅर्पोरेट घराण्यांच्या मक्तेदारीला केंद्र सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. काही उद्योगपतींनी आधी गोदामे तयार केली व नंतर कायदे बनविले गेल्याचे निदर्शनास आले आहे. यातून एकच सिद्ध होते की, हे सर्व उद्योग जगतासाठी सुरू आहे. ज्या दिवशी धान्याचा बाजार कॉर्पोरेट जगताच्या ताब्यात जाईल, त्यावेळी पेट्रोल-डिझेल प्रमाणे दररोज अन्नधान्याचे दर वाढतील. त्यामुळे वेळीच कायद्यांना विरोध करण्याची आवश्यकता आहे.

सरकार व आंदोलकांमध्ये फक्त एका फोनचे अंतर असल्याचे बोलले जाते. मात्र, पंधरा लाख रुपयांच्या आश्वासनाप्रमाणेच तो एक जुमला आहे. देशाची अर्थव्यवस्था उणे २० टक्केपर्यंत खाली गेली होती. केवळ कृषी क्षेत्रात तीन टक्के वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००८ मध्ये कृषी क्षेत्राने भारताला मंदीपासून वाचविल्याचे स्पष्ट केले होते. ही शेतकऱ्यांची ताकद आहे, असे सिंग म्हणाले.

भाजपचे काही खासदार व त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल शेतकरी आंदोलनाविषयी बोलत आहेत. आरएसएसच्या भारतीय किसान संघानेही धरणे दिले आहे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

----------