शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांविरुद्ध दीर्घकाळ लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

येथील शासकीय विश्रामगृहावर श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नठ ...

येथील शासकीय विश्रामगृहावर श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नठ बोलत होते. अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ. राजाराम सिंग, बिहारचे आमदार सुदामा प्रसाद, सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटक कॉ. किशोर ढमाले, सचिव करणसिंग कोकणी, श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. बाळासाहेब सुरुडे, जीवन सुरुडे उपस्थित होते.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात प्रथमच देशातील शेतकरी सर्वांना संघटित करत आहे. हे कायदे मागे घेण्यासाठी २७ सप्टेंबरला देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने तो निश्चितच यशस्वी होईल, अशी अपेक्षा नठ यांनी व्यक्त केली.

राजाराम सिंग म्हणाले, उत्पादन, साठवणूक व वितरणावर काॅर्पोरेट घराण्यांच्या मक्तेदारीला केंद्र सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. काही उद्योगपतींनी आधी गोदामे तयार केली व नंतर कायदे बनविले गेल्याचे निदर्शनास आले आहे. यातून एकच सिद्ध होते की, हे सर्व उद्योग जगतासाठी सुरू आहे. ज्या दिवशी धान्याचा बाजार कॉर्पोरेट जगताच्या ताब्यात जाईल, त्यावेळी पेट्रोल-डिझेल प्रमाणे दररोज अन्नधान्याचे दर वाढतील. त्यामुळे वेळीच कायद्यांना विरोध करण्याची आवश्यकता आहे.

सरकार व आंदोलकांमध्ये फक्त एका फोनचे अंतर असल्याचे बोलले जाते. मात्र, पंधरा लाख रुपयांच्या आश्वासनाप्रमाणेच तो एक जुमला आहे. देशाची अर्थव्यवस्था उणे २० टक्केपर्यंत खाली गेली होती. केवळ कृषी क्षेत्रात तीन टक्के वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००८ मध्ये कृषी क्षेत्राने भारताला मंदीपासून वाचविल्याचे स्पष्ट केले होते. ही शेतकऱ्यांची ताकद आहे, असे सिंग म्हणाले.

भाजपचे काही खासदार व त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल शेतकरी आंदोलनाविषयी बोलत आहेत. आरएसएसच्या भारतीय किसान संघानेही धरणे दिले आहे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

----------