अहमदनगर : आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या जवानांच्या हातावर आज ‘लोकमत’ ने राख्या बांधल्या. बहिणींच्या मायेने जवान भारावले. सखींनी गायलेल्या कवितांनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि अंगावर रोमांचही उभे राहिले.सेंट्रल टँक म्युझियम येथे लोकमत सखी मंच सदस्यांनी जवानांच्या हातावर राखी बांधली. भावा-बहिणीच्या अतूट नात्याला राखीच्या रुपाने नवी रेशीम गाठ बांधली जाते. या दिवशी भाऊ- बहिणीला तिच्या रक्षणाचे अभिवचन देतो. मात्र, घरापासून दूर असलेल्या व देशाचे रक्षण करण्याऱ्या जवानांना राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिणीकडून राखी बांधून घ्यायला मिळत नाही. या जवानांना बहिणीची माया देत आणि त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करत ‘लोकमत’ च्यावतीने सखी मंच सदस्यांनी रक्षाबंधन साजरे केले.(प्रतिनिधी)
‘लोकमत’ने बांधले जवानांशी ऋणानुबंध!
By admin | Updated: August 12, 2014 02:03 IST