शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

Lok Sabha Elecation 2019 : उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची राष्ट्रवादीची चाल : बबनराव पाचपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:34 IST

डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली.

श्रीगोंदा : डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली.भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत विखे यांना मानणारे सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार दिलीप गांधींनी मतदारसंघात चांगली केली पण सर्व्हेत डॉ. सुजय विखे यांचे नाव पुढे होत. सुजय विखेंना भाजपात घ्या आणि उमेदवारी द्या असे आपणच दोन महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. विखेंना उमेदवारी मिळाली असली तरी खासदार दिलीप गांधी हेही लवकरच प्रचार यंत्रणेत सहभागी होतील, अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोदा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली.यावेळी लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंना आमदार करण्यासाठी करू अशी ग्वाही विखे समर्थकांनी दिलीभगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार यांनी सकारात्मक भुमिका घेतली. आता सर्व जण एकत्र आले आहेत. एक जीवाने काम करू, असेही पाचपुते म्हणाले. यावेळी सदाआण्णा पाचपुते, दत्तात्रय पानसरे, तुकाराम दरेकर, पुरूषोत्तम लगड, विठ्ठलराव काकडे, संतोष लगड, अनिल पाचपुते, सुभाष डांगे, विक्रमसिंह पाचपुते, बाळासाहेब गिरमकर, गणपतराव काकडे, अनिल ठवाळ, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब खेतमाळीस, मिलिंद दरेकर, राजेंद्र म्हस्के यांची भाषणे झाली.दक्षिणेत काँग्रेस भुईसपाट होणार - अण्णासाहेब शेलारमी पुर्वी बबनराव पाचपुते यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो. आता विखेंचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी नोंद आहे . यापुढे मी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुक लढणार नाही. त्यामुळे मी कुणाचा स्पर्धक राहिलो नाही. बाळासाहेब थोरात यांनी माझ्या जागेवर जिल्हाध्यक्ष म्हणून नागवडे यांना संधी दिली असती तर बर झाले असते. सध्या प्रचारक तेच, उद्घाटक व तेच प्रेक्षक अशी परिस्थिती थोरांताची झाली आहे. त्यामुळे आता दक्षिणेत काँग्रेस भुईसपाट होणार, अशी टीकाही शेलार यांनी केली.तर शांत राहीलो असतोअनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असती तर शांत राहावे लागले असते. परंतु आता विषय संपला आहे. नागवडे यांनी पवारांचा शब्द पाळला होता. पण नागवडे यांना दिलेला शब्द पवारांनी पाळला का असा चिमटा बबनराव पाचपुते यांनी काढला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९