शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी : जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी : जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे व कोठे करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लोणी (ता.राहाता), घोडेगाव (ता.नेवासा), कोपरगाव, आळेफाटा(पुणे) येथील जनावरांचे आठवडे बाजार दुधाळ गायीसाठी आणि गाभण गायीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब राज्यातून हजारो जनावरे येथे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. यामध्ये लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही चांगले उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे सर्वंकाही ठप्प झाले आहे. हे आठवडा बाजार तीन-चार महिन्यांपासून बंद आहेत.

या जनावरांच्या बाजारात बैल, गाई, म्हशी, शेळी, मेंढी आदींची खरेदी-विक्री होत असते. स्थानिक परिसरातील तसेच परराज्यातून आलेले व्यापारी हे व्यवहार करून घेतात त्यातून त्यांना कमिशन मिळते त्यांचाही उदरनिर्वाह या जनावरांच्या बाजार व्यवहारातून चालतो पण हे बाजार बंद झाल्याने तेही व्यापारी आता अडचणीत सापडले आहेत.

सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. काही भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आपली जनावरे विकायची आहेत पण बाजार बंद आहे. त्यामुळे ती विकायची कुठे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोना महामारी संकटामुळे गतवर्षीपासून शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. दुधाचा विक्रीचाही प्रश्न निर्माण होत आहे. खाद्य व दुधाचा दर यामध्ये मोठी तफावत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.

................

जनावरांना मिळेना किंमत

हा व्यवसाय बंद करावा, असे अनेकांना वाटत आहे पण गाई-म्हशी विकायच्या म्हटलं तर बाजार बंदमुळे त्यांना योग्य किंमत येत नाही. त्यामुळे सहन होईना अन्‌ सांगता येईना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. सध्या गाय आणि म्हशीच्या दुधाला योग्य दर मिळत नाही, खाद्य व दर यांचा मेळ बसत नाही. त्यातच लॉकडाऊनच्या नावाखाली खाद्याचे दर वाढलेले आहेत. दुधाचे दर कमी झाल्याचे या सगळ्या परिस्थितीत व्यवसाय करणे अवघड झाले. परिणामी जनावरे सांभाळणे कठीण बनले आहे.

-किरण घोगरे, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, लोणी,ता.राहाता

.................

लोणी (ता.राहाता) येथे जनावरांचा बाजार भरतो तो राज्यभर आणि राज्याबाहेर प्रसिद्ध आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बाजाराच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते पण सध्या कोरोना महामारी संकटामुळे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे. गतवर्षी कोरोनामुळे अनेक महिने बाजार बंद होता त्याचाही फटका बसला आहे.

-उद्धव देवकर,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता.

............................

बैलजोडीची खरेदी-विक्री बंद आहे

काही भागात अजूनही पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने शेतीची मशागत करून शेती केली जाते; मात्र सध्या सर्वच जनावरांच्या बाजाराला ब्रेक लागलेला आहे. त्यातच खरीप हंगाम तोंडावर आला असून शेती मशागतीची लगबग वाढली आहे. शेती करण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे; परंतु सध्या शेतकऱ्यांना चांगली बैलजोडी मिळविण्यासाठी शोध घ्यावा लागत आहे.