शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

कालबाह्य पाणी योजनेवर बोगस नळ कनेक्शनचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : शेवगाव-पाथर्डी शहरासह ५४ गावांसाठी वरदान ठरलेल्या व सध्या कालबाह्य झालेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शेवगाव : शेवगाव-पाथर्डी शहरासह ५४ गावांसाठी वरदान ठरलेल्या व सध्या कालबाह्य झालेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवर बोगस नळ कनेक्शनचा अतिरिक्त भार आहे. शेवगाव शहरात १८ हजार घरे (उंबरे) असून नळ कनेक्शन अवघी सात हजार आहेत. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नियमित पाणीपट्टी भरणारांना विनाकारण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

शेवगाव शहराचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. मात्र, त्यातुलनेत विस्तारलेल्या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन, पदाधिकारी असमर्थ ठरत आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची ३८ हजार ३७५ लोकसंख्या आहे. प्रत्यक्षात गत दहा वर्षांत लोकसंख्येने ५० हजारांचा आकडा ओलांडला आहे. वाढलेली लोकसंख्या, त्या तुलनेत अपुरी पाणी साठवण क्षमता, गल्लीबोळातील कालबाह्य झालेल्या जलवाहिन्या, पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात बसविण्यात आलेले ३१० व्हॉल्व्ह, २ हजारहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन, सद्य:परिस्थितीत सुरू असलेला विजेचा लपंडाव यामुळे शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. कालबाह्य झालेल्या जलवाहिनीवरील पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात तब्बल ३१० व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. १८ हजार उंबरे असलेल्या शहरात केवळ ७ हजार नळ कनेक्शन अधिकृत असून काही दिवसांपूर्वी पालिकेने ४०० अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत केले आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे समजून घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ प्रतिनिधीने केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

---

योजनेचे आयुर्मान संपले..

१९९८ साली कार्यान्वित झालेल्या शेवगाव-पाथर्डी ५४ गावे पाणी पुरवठा योजनेचे आयुर्मान १५ वर्षांचे होते. त्या बाबीलाही आता ७ वर्षे उलटली. त्याच योजनेवर लाखो लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे.

----

पाणी साठवण्यासाठी टाक्यांची कमतरता

५० हजार लोकसंख्येच्या शहरात केवळ १७.५ लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाक्या आहेत. पंचायत समितीसमोर ७.५ लाख लिटर तर तहसील कार्यालयाशेजारी १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी आहे. शहराला सरासरी ५५ ते ६० लाख लिटर प्रतिदिन पाणी आवश्यक आहे. त्यामुळे आणखी टाक्या नव्याने बांधणे गरजेचे आहे.

--

करार करण्यास टाळाटाळ..

पालिकेला जिल्हा परिषदेने योजनेंतर्गत करार करण्यासंदर्भात कळविले आहे. शहरात नळ कनेक्शन किती? नागरिक किती? याची माहिती देऊन पाण्याची आवश्यकता, यासंबंधी करार करण्यास दोन वर्षांपूर्वीच सांगितले आहे. मात्र, पालिका करारही करत नाही अन‌् पाणीपट्टीपोटी थकलेले ८ कोटीही भरण्यास टाळाटाळ करत आहे.