शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

चाऱ्याअभावी पशुधन गोशाळेत

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अनिल साठे, भिंगार जिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले आहे.

अनिल साठे, भिंगारजिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले आहे. दुष्काळाची तीव्रता, पाण्याचे हाल व चाऱ्याचा तुटवडा लक्षात घेत गोठ्यातील गायी गोशाळेत पाठविल्या जात आहेत. अन्य जनावरे बाजारात आणणे शेतकऱ्यांना भाग पडले आहे. पशुधन जगवायचे कसे? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविणे अपेक्षित असताना अद्याप दुष्काळ तीव्रतेच्या आढावा बैठका व कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन व्यस्त आहे. पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. ऊस, मका, घास यांसारख्या चारा लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. शेतकऱ्यांना गोठ्यामधील गाय, म्हैस, बैल, बकऱ्या यांसारखी जनावरे जगवायची तरी कशी, हा मोठा प्रश्न पडला आहे. मुबलक चारा नसल्याने चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. महागडा चारा आणण्यासाठी पैसे आणायचे तरी कोठून, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. यावर तोडगा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गाई गोशाळेत सोडल्या आहेत. म्हशी, बैल, बकऱ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात आहेत. बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने जनावरे रस्त्यावर मोकळे सोडण्यापलिकडे पर्याय राहिलेला नाही. जिल्ह्यात अनेक समाजसेवी मंडळी, संस्था, देवालये यांच्या गोशाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गोशाळा चालक नागरिकांची देणगी घेवून जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था करीत आहेत. दाखल होणाऱ्या गायींचा ओघ सुरूच आहे.