शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी पशुधन गोशाळेत

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अनिल साठे, भिंगार जिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले आहे.

अनिल साठे, भिंगारजिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले आहे. दुष्काळाची तीव्रता, पाण्याचे हाल व चाऱ्याचा तुटवडा लक्षात घेत गोठ्यातील गायी गोशाळेत पाठविल्या जात आहेत. अन्य जनावरे बाजारात आणणे शेतकऱ्यांना भाग पडले आहे. पशुधन जगवायचे कसे? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविणे अपेक्षित असताना अद्याप दुष्काळ तीव्रतेच्या आढावा बैठका व कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन व्यस्त आहे. पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. ऊस, मका, घास यांसारख्या चारा लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. शेतकऱ्यांना गोठ्यामधील गाय, म्हैस, बैल, बकऱ्या यांसारखी जनावरे जगवायची तरी कशी, हा मोठा प्रश्न पडला आहे. मुबलक चारा नसल्याने चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. महागडा चारा आणण्यासाठी पैसे आणायचे तरी कोठून, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. यावर तोडगा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गाई गोशाळेत सोडल्या आहेत. म्हशी, बैल, बकऱ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात आहेत. बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने जनावरे रस्त्यावर मोकळे सोडण्यापलिकडे पर्याय राहिलेला नाही. जिल्ह्यात अनेक समाजसेवी मंडळी, संस्था, देवालये यांच्या गोशाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गोशाळा चालक नागरिकांची देणगी घेवून जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था करीत आहेत. दाखल होणाऱ्या गायींचा ओघ सुरूच आहे.