शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

माणूस म्हणून जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 14:27 IST

अंतर्मुख झाले की चुका कशामुळे झाल्या, ते  कळू लागते. त्यात सुधारणा केल्या की समस्या सुटतात. स्वत:च्या समस्या या स्वत:च्या चुकीमुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्या तो स्वत:च सोडवू शकतो, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये येणे आवश्यक आहे.

अध्यात्म/राजाभाऊ कोठारी, मंगल भक्त सेवा मंडळाचे प्रमुख, अहमदनगर.आजकाल प्रत्येकाला वेगवेगळ््या समस्या आहेत. मात्र या समस्या कोण निर्माण करतो? तर स्वत:कडून झालेल्या ज्या काही चुका असतात, त्यामुळेच समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यासाठी प्रत्येकाने अंतर्मुख होणे गरजेचे आहे. अंतर्मुख झाले की चुका कशामुळे झाल्या, ते  कळू लागते. त्यात सुधारणा केल्या की समस्या सुटतात. स्वत:च्या समस्या या स्वत:च्या चुकीमुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्या तो स्वत:च सोडवू शकतो, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये येणे आवश्यक आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी दुसरा-तिसरा कोणी येणार नाही. समस्या सुटण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. तेच काम सध्याच्या काळात महत्त्वाचे आहेत. घरातील एक मुलगा वाईट मार्गावर गेला तर अख्खे कुटुंबाचे जीवन विस्कळीत होते. म्हणून तरुणांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. ‘जेथे कमी- तेथे कुवतीनुसार आम्ही’ हे ब्रीद घेऊन मंगल भक्त सेवा मंडळ गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहे. हेच काम प्रत्येकाने केले पाहिजे. वर्षभरात ५४ उपक्रम राबविले जातात. नापासांशी शाळा, आरोग्यासाठी ८० गावे दत्तक, आरोग्य शिबिरे, हनुमान चालिसा आदी कार्यक्रमातून तरुणांना विधायक मार्गावर आणण्याचे व्रत अंगीकारले आहे. दत्त म्हणजे देण्याचे काम करतात. घेण्याचे नव्हे. म्हणून देण्याची प्रेरणा निर्माण झाली तर समाजातील अनेक प्रश्न सुटतील. आपण माणूस म्हणून जगतो आहोत याची जाणीव पदोपदी होणे आवश्यक आहे. माणूस असल्याची प्रचिती आपल्या वाणीतून, कृतीमधून सिद्ध झाली पाहिजे. आपण स्वत:पुरता विचार न करता आवतीभोवती असलेल्या प्रत्येकाचा विचार केला पाहिजे. आपण सारे मानव योनीत आहोत. माणसाचे गुणधर्म आपल्याकडे आहेत, का हेच आपल्याकडून सिद्ध झाले पाहिजे. आणि असे झाले तर व्यक्तीच्या, समाजाच्या समस्या शून्य व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येक समस्यांचे उत्तर आपल्याकडेच असतात. अंतमुर्ख होऊन विचार केला. चुका सुधारल्या तर जीवनात कोणीतीही अडचतण निर्माण होणार नाही.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक