शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पडझडीच्या काळात साहित्यच सावरण्याचे काम करेल : अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:23 IST

इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे,

लोणी : इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे, असे सांगतानाच नवलेखक, साहित्यिक जीवनाचे आकलन करीत वर्तमानात जगण्यासाठी जे गरजेचे आहे ते आपल्या लेखनातून पुढे घेऊन जात आहेत. समाजात जेव्हा सगळीकडून पडझड होईल तेव्हा या नवलेखकांच्या साहित्याकडे समाज एक आश्वासक साहित्य म्हणून बघेल, असे स्पष्ट मत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंती निमित्ताने बुधवारी आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. ढेरे बोलत होत्या. केंद्रीय ग्राहक व्यवहार तसेच अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर कदम, विजय वहाडणे, अनुराधा आदिक, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (पुणे) यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या‘जुगाड’ कादंबरीस प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य गौरव पुरस्कार प्रा.गो.तु.पाटील (येवला) यांच्या ‘ओल अंतरीची’या आत्मचरित्रास तर जिल्हास्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय (संगमनेर) यांच्या ‘दिवस आलापल्लीचे’ या ललित लेखनास देण्यात आला. जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार डॉ.शैलेश त्रिभुवन (कोपरगाव) यांच्या ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या कवितासंग्रहास यावेळी देण्यात आला.कलेच्या सेवेसाठी असलेल्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार धनंजय गोवर्धने (नाशिक) यांना तर समाज प्रबोधन पुरस्कार शमशुद्दीन तांबोळी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार राजकुमार तांगडे (जालना) यांना प्रदान करण्यात आला.ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पुरस्काराची घोषणा केली. आभार विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे यांनी मानले. सूत्रसंचालन दिनेश भाने व गायत्री म्हस्के यांनी केले.पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी एक प्रकारे क्रांती निर्माण केली. डॉ.बाळासाहेब विखे यांनी सुरु केलेली पुरस्काराची ही परंपरा द्रष्टेपणाची आहे. या पुरस्कारामुळे लेखनाचा उत्साह अधिक वाढला आहे. -डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक.प्रवरा परिवाराकडून पूरग्रस्तांना एक कोटीप्रवरा परिसराने सदैव सामाजिक प्रश्नांना आपले माणून मार्गक्रमण केले. समाजाची दु:ख आपली मानली. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, विखे पाटील फाउंडेशन आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने १ कोटी रुपयांची वस्तुरुपी मदत करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता