शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

पडझडीच्या काळात साहित्यच सावरण्याचे काम करेल : अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:23 IST

इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे,

लोणी : इतिहास कधी बदलत नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानाचा वेध घेत इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार केली पाहिजे, असे सांगतानाच नवलेखक, साहित्यिक जीवनाचे आकलन करीत वर्तमानात जगण्यासाठी जे गरजेचे आहे ते आपल्या लेखनातून पुढे घेऊन जात आहेत. समाजात जेव्हा सगळीकडून पडझड होईल तेव्हा या नवलेखकांच्या साहित्याकडे समाज एक आश्वासक साहित्य म्हणून बघेल, असे स्पष्ट मत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंती निमित्ताने बुधवारी आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. ढेरे बोलत होत्या. केंद्रीय ग्राहक व्यवहार तसेच अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर कदम, विजय वहाडणे, अनुराधा आदिक, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (पुणे) यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या‘जुगाड’ कादंबरीस प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य गौरव पुरस्कार प्रा.गो.तु.पाटील (येवला) यांच्या ‘ओल अंतरीची’या आत्मचरित्रास तर जिल्हास्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय (संगमनेर) यांच्या ‘दिवस आलापल्लीचे’ या ललित लेखनास देण्यात आला. जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार डॉ.शैलेश त्रिभुवन (कोपरगाव) यांच्या ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या कवितासंग्रहास यावेळी देण्यात आला.कलेच्या सेवेसाठी असलेल्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार धनंजय गोवर्धने (नाशिक) यांना तर समाज प्रबोधन पुरस्कार शमशुद्दीन तांबोळी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार राजकुमार तांगडे (जालना) यांना प्रदान करण्यात आला.ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.ग्रामीण भागातील आणि सहकारातील आदर्श नेतृत्वाच्या व्याख्या या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आपल्या सामर्थ्याने उभ्या केल्या आहेत. वेगळी विचारधारा असलेल्या या वाड्.मयामध्ये आता डावा आणि उजवेपणा राहिला नाही. कित्येक जण मराठी वाड्.मयात आपल्या साहित्याच्या लेखनामागे किंवा त्याच्या प्रसिद्धी मागे आपला छुपा उद्देश वा व्यवहार ठेवत आहे. पण आता मात्र नव साहित्यिक आपल्या लेखनातून स्वत:ची वाट शोधत आहेत. जगणे काय आहे ते आपल्या साहित्यातून ते सिध्द करीत आहे. हे सिध्द करताना ते स्वत:च्या जगण्यात घुसत आहे आणि स्वत:चे जगणे प्रामाणिकपणे लिहित आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या.खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पुरस्काराची घोषणा केली. आभार विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे यांनी मानले. सूत्रसंचालन दिनेश भाने व गायत्री म्हस्के यांनी केले.पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी एक प्रकारे क्रांती निर्माण केली. डॉ.बाळासाहेब विखे यांनी सुरु केलेली पुरस्काराची ही परंपरा द्रष्टेपणाची आहे. या पुरस्कारामुळे लेखनाचा उत्साह अधिक वाढला आहे. -डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक.प्रवरा परिवाराकडून पूरग्रस्तांना एक कोटीप्रवरा परिसराने सदैव सामाजिक प्रश्नांना आपले माणून मार्गक्रमण केले. समाजाची दु:ख आपली मानली. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, विखे पाटील फाउंडेशन आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने १ कोटी रुपयांची वस्तुरुपी मदत करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता