शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी लेबल नसावे - पंकज चांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:13 IST

समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.

संगमनेर : समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या सुधा-कुसूम पुरस्काराने संगमनेरचे साहित्यिक अनिल देशपांडे यांना गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी त्यांच्या मानवी कर्तृत्वाचा वेध घेणा-या ‘कर्मयोगी’ कादंबरीची झाली निवड झाली होती. नागपूर येथे झालेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. चांदे बोलत होते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, शैलेश पांडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, कविता शनवारे आदी मंचावर उपस्थित होते.पद्मगंधाच्या अध्यक्षा भडभडे यांनी पद्मगंध प्रतिष्ठानचा गेल्या २५ वर्षांचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रतिभावंत साहित्यिकांचा भरणा असून त्यांच्या साहित्यकृतींना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. संगमनेरच्या देशपांडे यांची कर्मयोगी ही कांदबरी मानवी कर्तृत्वाचा वेध घेणारी आहे. त्याच्या चिंतनातून समाजाच्या प्रतिची कणव प्रवाहित होत असल्याचे भडभडे म्हणाल्या. पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ब्राह्मणकर यांनी प्रास्तविक केले. वसुधा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. संगीता वाईकर यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर