शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरवरील कचऱ्याचा भार पुन्हा हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, ...

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, बाजारपेठा बंद असल्याने कचऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाऊन नसताना दररोज १५० टन कचरा जमा होेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यात घट होऊन सध्या दररोज १२० ते १२५ टन इतका कचरा जमा होत आहे.

शहर व परिसरातून दररोज दीडशे टनाहून अधिक कचरा जमा होत असतो. कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने वाहने खरेदी करून ती ठेकेदाराला भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. कचरा संकलन होत नसल्याच्या अनेक तक्रारीही महापालिकेत होत होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात पहिल्या लाटेत कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. मागील वर्षीही हे कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला कचरा ठेकेदाराने लॉकडाऊनच्या काळात उचलला. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला दिसणारे कचऱ्याचे ढीग कमी झाले आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्यात महापालिकेने कडक पावले उचलत वैद्यकीय सेवा वगळता सर्व किराणा, भाजीपाला, बाजारपेठा, हॉटेल, खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व शहरात ३ मेपासून कठोर निर्बंध लागू केल्याने भाजीबाजार, हॉटेल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्यांचे प्रमाण घटले असून, महापालिकेवरील भारही कमी झाला आहे. कचरा संकलनात २५ टनांची घट झाली आहे. घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यातही घट झाली असल्याचे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

....

जैववैद्यकीय कचऱ्यात वाढ

कोरोनाच्या काळात वैद्यकीय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना नसताना दररोज ४०० ते ५०० किलो जैववैद्यकीय कचरा संकलित होत होता. सध्या दररोज दीड टन जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. हा कचरा कोरोना रुग्णालयातील असल्याने तो जाळून त्यापासून तयार झालेली राख कारखान्यांना पुरविली जात असल्याचे सांगण्यात आले.

...

पीपीई किट कमी झाले, काचेच्या बाटल्या वाढल्या

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई किट मोठ्या प्रमाणात जमा हाेत होते. परंतु, दुसऱ्या लाटेत पीपीई किट वापराचे प्रमाण कमी होऊन काचेच्या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

....

- कोरोनामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने, हॉटेल, भाजीबाजार, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण घटले असून, सध्या ११८ ते १२५ टनापर्यंत कचरा जमा होत आहे.

-किरण देशमुख, स्वच्छता निरीक्षक, महापालिका