शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

नगरवरील कचऱ्याचा भार पुन्हा हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, ...

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, बाजारपेठा बंद असल्याने कचऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाऊन नसताना दररोज १५० टन कचरा जमा होेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यात घट होऊन सध्या दररोज १२० ते १२५ टन इतका कचरा जमा होत आहे.

शहर व परिसरातून दररोज दीडशे टनाहून अधिक कचरा जमा होत असतो. कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने वाहने खरेदी करून ती ठेकेदाराला भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. कचरा संकलन होत नसल्याच्या अनेक तक्रारीही महापालिकेत होत होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात पहिल्या लाटेत कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. मागील वर्षीही हे कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला कचरा ठेकेदाराने लॉकडाऊनच्या काळात उचलला. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला दिसणारे कचऱ्याचे ढीग कमी झाले आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्यात महापालिकेने कडक पावले उचलत वैद्यकीय सेवा वगळता सर्व किराणा, भाजीपाला, बाजारपेठा, हॉटेल, खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व शहरात ३ मेपासून कठोर निर्बंध लागू केल्याने भाजीबाजार, हॉटेल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्यांचे प्रमाण घटले असून, महापालिकेवरील भारही कमी झाला आहे. कचरा संकलनात २५ टनांची घट झाली आहे. घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यातही घट झाली असल्याचे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

....

जैववैद्यकीय कचऱ्यात वाढ

कोरोनाच्या काळात वैद्यकीय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना नसताना दररोज ४०० ते ५०० किलो जैववैद्यकीय कचरा संकलित होत होता. सध्या दररोज दीड टन जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. हा कचरा कोरोना रुग्णालयातील असल्याने तो जाळून त्यापासून तयार झालेली राख कारखान्यांना पुरविली जात असल्याचे सांगण्यात आले.

...

पीपीई किट कमी झाले, काचेच्या बाटल्या वाढल्या

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई किट मोठ्या प्रमाणात जमा हाेत होते. परंतु, दुसऱ्या लाटेत पीपीई किट वापराचे प्रमाण कमी होऊन काचेच्या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

....

- कोरोनामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने, हॉटेल, भाजीबाजार, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण घटले असून, सध्या ११८ ते १२५ टनापर्यंत कचरा जमा होत आहे.

-किरण देशमुख, स्वच्छता निरीक्षक, महापालिका