शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नगरवरील कचऱ्याचा भार पुन्हा हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, ...

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, बाजारपेठा बंद असल्याने कचऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाऊन नसताना दररोज १५० टन कचरा जमा होेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यात घट होऊन सध्या दररोज १२० ते १२५ टन इतका कचरा जमा होत आहे.

शहर व परिसरातून दररोज दीडशे टनाहून अधिक कचरा जमा होत असतो. कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने वाहने खरेदी करून ती ठेकेदाराला भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. कचरा संकलन होत नसल्याच्या अनेक तक्रारीही महापालिकेत होत होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात पहिल्या लाटेत कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. मागील वर्षीही हे कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला कचरा ठेकेदाराने लॉकडाऊनच्या काळात उचलला. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला दिसणारे कचऱ्याचे ढीग कमी झाले आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्यात महापालिकेने कडक पावले उचलत वैद्यकीय सेवा वगळता सर्व किराणा, भाजीपाला, बाजारपेठा, हॉटेल, खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व शहरात ३ मेपासून कठोर निर्बंध लागू केल्याने भाजीबाजार, हॉटेल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्यांचे प्रमाण घटले असून, महापालिकेवरील भारही कमी झाला आहे. कचरा संकलनात २५ टनांची घट झाली आहे. घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यातही घट झाली असल्याचे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

....

जैववैद्यकीय कचऱ्यात वाढ

कोरोनाच्या काळात वैद्यकीय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना नसताना दररोज ४०० ते ५०० किलो जैववैद्यकीय कचरा संकलित होत होता. सध्या दररोज दीड टन जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. हा कचरा कोरोना रुग्णालयातील असल्याने तो जाळून त्यापासून तयार झालेली राख कारखान्यांना पुरविली जात असल्याचे सांगण्यात आले.

...

पीपीई किट कमी झाले, काचेच्या बाटल्या वाढल्या

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई किट मोठ्या प्रमाणात जमा हाेत होते. परंतु, दुसऱ्या लाटेत पीपीई किट वापराचे प्रमाण कमी होऊन काचेच्या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

....

- कोरोनामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने, हॉटेल, भाजीबाजार, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण घटले असून, सध्या ११८ ते १२५ टनापर्यंत कचरा जमा होत आहे.

-किरण देशमुख, स्वच्छता निरीक्षक, महापालिका