शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नगरवरील कचऱ्याचा भार पुन्हा हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, ...

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, बाजारपेठा बंद असल्याने कचऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाऊन नसताना दररोज १५० टन कचरा जमा होेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यात घट होऊन सध्या दररोज १२० ते १२५ टन इतका कचरा जमा होत आहे.

शहर व परिसरातून दररोज दीडशे टनाहून अधिक कचरा जमा होत असतो. कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने वाहने खरेदी करून ती ठेकेदाराला भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. कचरा संकलन होत नसल्याच्या अनेक तक्रारीही महापालिकेत होत होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात पहिल्या लाटेत कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. मागील वर्षीही हे कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला कचरा ठेकेदाराने लॉकडाऊनच्या काळात उचलला. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला दिसणारे कचऱ्याचे ढीग कमी झाले आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्यात महापालिकेने कडक पावले उचलत वैद्यकीय सेवा वगळता सर्व किराणा, भाजीपाला, बाजारपेठा, हॉटेल, खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व शहरात ३ मेपासून कठोर निर्बंध लागू केल्याने भाजीबाजार, हॉटेल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्यांचे प्रमाण घटले असून, महापालिकेवरील भारही कमी झाला आहे. कचरा संकलनात २५ टनांची घट झाली आहे. घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यातही घट झाली असल्याचे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

....

जैववैद्यकीय कचऱ्यात वाढ

कोरोनाच्या काळात वैद्यकीय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना नसताना दररोज ४०० ते ५०० किलो जैववैद्यकीय कचरा संकलित होत होता. सध्या दररोज दीड टन जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. हा कचरा कोरोना रुग्णालयातील असल्याने तो जाळून त्यापासून तयार झालेली राख कारखान्यांना पुरविली जात असल्याचे सांगण्यात आले.

...

पीपीई किट कमी झाले, काचेच्या बाटल्या वाढल्या

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई किट मोठ्या प्रमाणात जमा हाेत होते. परंतु, दुसऱ्या लाटेत पीपीई किट वापराचे प्रमाण कमी होऊन काचेच्या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

....

- कोरोनामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने, हॉटेल, भाजीबाजार, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण घटले असून, सध्या ११८ ते १२५ टनापर्यंत कचरा जमा होत आहे.

-किरण देशमुख, स्वच्छता निरीक्षक, महापालिका