शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंतरंगात दयेचा दिवा पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:25 IST

दया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे.

सन्मतीवाणीदया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे.दया माणसाच्या स्वभावात परिवर्तन घडविते. दया हृदय परिवर्तन देखील करु शकते. जीवन सुखद करण्यासाठी दया आवश्यक आहे. ज्यांच्या हृदयात सरलता आहे. तेथेच धर्माचे वास्तव्य असते. पाणी हे प्रवाही असते. पाण्यात कोणताही पदार्थ सामावून घेण्याची शक्ती असते. दयाळू माणसाच्या हृदयात धर्म वास करतो.धर्मामुळे असत्य दूर होते. स्वभाव बदलतो, प्रत्येक माणसाने भूतदया दाखविण्याची आवश्यकता आहे. भूतदया दाखविणे हाच खरा धर्म मानला जातो. सर्व प्राणीमात्रांवर समान प्रेम करण्यातच आपले हित आहे. ज्याच्या हृदयात दयाच नाही तो दुर्जन समजावा असे संत तुकाराम महाराज म्हणतात. पित्याने आपल्या सर्व मुलांवर समान प्रेम करावे. ज्या ठिकाणी मर्यादा आहे तेथेच धर्माचे अस्तित्व असते. ज्या ठिकाणी अधर्म असतो तेथे सुख, शांती नसते. परिवारात प्रेम, स्नेह जपला पाहिजे. तपसाधनेमुळेच मानसिक स्वास्थ्य ठीक राहते. आईचे मुलांबद्दलचे वात्सल्य अमोल असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. जोपर्यंत अंतरंगात दयेचा दिवा प्रकट होत नाही तोपर्यंत जीवनाला जीवन म्हणता येणार नाही. दया नसेल तेथे अधर्म असतो. तो दूर करण्यासाठी अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची आवश्यकता आहे.-प.पू.सन्मती महाराज.

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर