बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय ढोल श्रीगोंदा मतदारसंघात वाजू लागले आहेत. विद्यमान आमदार बबनराव पाचपुतेंच्या गोटात मोदी लाटेचा धसका आहे. तर भाजपाच्या तिकिटासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडविले आहेत. ‘अबकी बार मीच आमदार’ अशी हवा बहुतेकांच्या डोक्यात घुसल्याने दररोज नवे राजकीय कलगीतुरे रंगत आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याचा आखाडा बहुरंगी ठरणार, अशी चिन्हे आहेत.लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदेकरांनी खासदार दिलीप गांधी यांना ५८ हजारांचे विक्रमी मताधिक्य देऊन आघाडीतील प्रस्थापितांना धक्का दिला. त्यामुळे भाजपाच्या कमळाचा निर्देशांक अपेक्षेपेक्षा अधिक वधारला. राष्ट्रवादीचे तिकीट आ.बबनराव पाचपुतेंना निश्चित मानले जाते. मात्र राकाँचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार हे ऐनवेळी तिकिटावर दावा ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपाकडून सुवर्णा पाचपुते, संतोष लगड, राजेंद्र म्हस्के इच्छुक आहेत. मात्र कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप यांनीही वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरू केल्या आहेत. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जोरावर मतदारसंघात ‘शिट्टी’ वाजविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसच्या अनुराधा नागवडे, अण्णासाहेब शेलार यांनीही चाचपणी सुरू केली आहे. सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनीही श्रीगोंदा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.आजवरच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत कुणाचीही लाट आली तरी आ.बबनराव पाचपुते यांनी वेगवेगळ्या चिन्हावर सहा विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याचा करिश्मा केला आहे. शिवाजीराव नागवडे यांचे समर्थक सध्या शांत दिसत आहेत. ऐनवेळी अनुराधा नागवडे यांचे महिला कार्ड पुढे केले जाईल, अशी चिन्हे आहेत. आ.पाचपुते यांनी पालकमंत्रीपदाच्या काळात दुष्काळ निवारणासाठी रोहयोतून केलेले काम आजही मतदारसंघात आठवले जाते. मात्र त्यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यात विरोधकांनी सातत्याने आरोपांचे हल्ले चढविले आहेत. कुकडी साखर कारखान्याच्या माध्यमातून राहुल जगताप यांनी साखर पेरणी केली आहे. भाजपाच्या महिला अध्यक्षा सुवर्णा पाचपुते यांनी तिकिटासाठी मुंबईपर्यंत लॉबिंग केले आहे. विधानसभा निवडणुकीत एम.आय.डी.सी., कुकडी, घोडचा पाणी प्रश्न, वीज, नगर-दौंड राजमार्ग, श्रीगोंदा शहरातील विजेचा खेळ खंडोबा, साकळाई या प्रश्नांवर राजकीय रान पेटण्याची चिन्हे आहेत.विधानसभा निवडणुकीत आजवर मतविभागणीचा फायदा आ.पाचपुतेंना झाला आहे. मात्र मोदी लाट आणि युवकांची बदललेली मानसिकता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. बहुतेक नेत्यांनी आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तिकीट पटकाविण्यात कोण बाजी मारतो आणि कोण बंड करतो, यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील.२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेराष्ट्रवादीबबनराव पाचपुते८०४१८भाजपाराजेंद्र नागवडे५२९७३अपक्षअण्णासाहेब शेलार३४६२६इच्छुकांचे नावपक्षबबनराव पाचपुतेराष्ट्रवादीराहुल जगतापभाजपाअनुराधा नागवडेकाँग्रेसबाळासाहेब नाहाटा स्वाभिमानी
दिग्गजांच्या डोक्यात आमदारकीची हवा!
By admin | Updated: June 13, 2014 01:15 IST