शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

अभिकर्ता संस्थेला कायदेशीर नोटीस

By admin | Updated: June 21, 2014 00:46 IST

अहमदनगर : कुठलीही नोटीस न देता शहर बससेवा बंद करणाऱ्या प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेला महापालिकेने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

अहमदनगर : कुठलीही नोटीस न देता शहर बससेवा बंद करणाऱ्या प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेला महापालिकेने कायदेशीर नोटीस बजावली आहे. बससेवा त्वरीत सुरू करावी अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असे या नोटीसीत नमूद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तोटा असल्याचे कारण सांगत अभिकर्ता संस्थेने दि. १८ पासून शहरात बससेवा बंद केली. करारनाम्यानुसार सेवा बंद करण्यापूर्वी तीन महिने अगोदर महापालिकेला तसे कळविणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही नोटीस न देता अभिकर्ता संस्थेने सेवा बंद केली. स्थायी समितीनेही नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारा संस्थेचा अर्ज फेटाळला होता. प्रशासनाच्यावतीने उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी कायदेशील सल्ला घेतल्यानंतर संस्थेला शुक्रवारी कायदेशीर नोटीस बजावली. बससेवा बंद असल्याने करारनाम्याचा भंग होत आहे.करारनाम्यातील तरतुदीनुसार रोज हजार रुपये दंडाची तरतूद आहे. बससेवा त्वरीत सुरू करावी अन्यथा तरतुदीनुसार हजार रुपये दंड आकारणी दि. १८ पासून सुरू का करू नये? असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यावर त्वरीत खुलासा करण्याचेही म्हटले आहे. महापालिकेच्या पॅनलवरील वकिलाच्या सहीने ही नोटीस अभिकर्ता संस्थेला बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांची बैठक लांबणीवरस्थायी समितीने संस्थेला नुकसान भरपाई वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर बससेवा बंद झाली. बससेवा बंद पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही महापौर संग्राम जगताप यानंी नगरवासियांना दिली आहे. स्थायी समितीचे सभापती, महापौर व प्रशासनाची बैठक अजूनही झालेली नाही. आयुक्त रजेवर असल्याने ती लांबल्याचे सांगण्यात आले. शहर बससेवा बंद पडल्यास दीडशे कर्मचाऱ्यांची उपासमार होणार आहे. त्यामुळे ही सेवा बंद पडू देऊ नका असे साकडे प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना घातले. कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर काही वेळ निदर्शने केली. पालिकेने सेवा बंद केली नाही, संस्थेनेच सेवा बंद केली. सेवा सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी दिले. फेबु्रवारी २०११ मध्ये शहरात प्रसन्ना पर्पल मोबालिटी या अभिकर्ता संस्थेने बांधा, वापरा व मालकी तत्वावर बससेवा सुरू केली. सेवा सुरू झाल्यानंतर वर्षभरातच सेवेला घरघर सुरू झाली. तोट्याचे कारण पुढे करत आता संस्थेने सेवाच बंद केली आहे. संस्थेकडे ३६ चालक, ४८ वाहक आणि इतर असे जवळपास दीडशे कर्मचारी आहेत. सेवा बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू झाली आहे. बससेवा बंद झाल्याने वृध्द, शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांचे हाल होत आहे. सर्वसामान्य जनतेला रिक्षाचा आधार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी बससेवा सुरू राहणे गरजेचे आहे. बससेवा सुरू रहाणे हे प्रवासी, शालेय विद्यार्थी व एमआयडीसीतील कामगारांच्या हिताचे आहे. त्यामुळे महापालिकेने ही सेवा राहण्यासाठी सकारात्मक विचार करावा असे साकडे या कर्मचाऱ्यांनी घातले. चालक-वाहकांच्या सह्या असलेले निवेदन उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांना देण्यात आले.