शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मुळा धरणाचा डावा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 16:55 IST

मुळा धरणाचा डावा कालवा आज बंद करण्यात आला आहे

राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा आज बंद करण्यात आला आहे. ६१४ दलघफु पाण्याचा वापर करण्यात आला असून २८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. रब्बीसाठी सोडण्यात आलेले हे शेवटचे आवर्तन २८ दिवस सुरू होते.मुळा डाव्या खालव्याखाली ऊस, कांदा, हरभरा, गहू व चारा पीके यांच्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला़ शेवटचे आवर्तन असल्याने डाव्या कालव्याखाली ऊसाच्या लागवडी झाल्या नाहीत. डाव्या कालव्याच्या पाण्याचा विषय संपल्याने शेतक-यांची भिस्त विहीरींच्या पाण्यावर आहे.  कालव्याच्या वरील भागात सध्या अवर्तनामुळे पाणी उपलब्ध आहे. मात्र पुर्व भागातील विहीरींनी तळ गाठला आहे.डाव्या कालव्याचे आवर्तन संपल्याने विहीरींच्या पाण्यावर पीक वाचविणे हे शेतक-यांपुढे आव्हान आहे़ पुर्व भागातील विहीरींचे पाणी फेबुवारीपर्यंत टिकण्याची शेतक-यांना अपेक्षा आहे़ यंदा डाव्या कालव्याखाली खरीप व रब्बी असे दोन अवर्तन मिळाले आहेत. २८ सहकारी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून रब्बीच्या पीकांना पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. मुळा डाव्या कालव्याखाली असलेला बारागाव नांदुर येथील हवरी ओढयावरील एक बंधारा पाण्याने भरला आहे. भागडा चारीच्या तिनही विद्युुत मोटारी बंद पडल्या़ त्यामुळे बारा दिवस पाण्याचे आवर्तन सुरू राहीले़. त्यामुळे ६० पैकी २० बंधारे पाण्याने भरण्यात आले आहे. शॉर्ट सर्कि टमुळे विद्युुत मोटारी बंद पडल्या होत्या़ गोदावरी जल विद्युुत प्रकल्प संगमनेर यांच्या ताब्यात हे पंपहाऊस आहेत.मुळा धरणाच्या डाव्या कालव्यासाठी मंजुर असलेले पाणी रब्बी आवर्तनसाठी वापरण्यात आले़ २८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. डाव्या कालव्याचा पाण्याचा कोटा संपला आहे़ डाव्याचे आवर्तन २८ दिवस सुरू होते़.- विकास गायक वाड, शाखा अभियंता मुळा डावा कालवा

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी