शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

कोरोनासोबत जगायला शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:52 IST

अहमदनगर : कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मनात भीती, चिंता, नैराश्य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे़ कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भितीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञांकडील गर्दी वाढली आहे़ प्रत्यक्षात मात्र भीती घेऊन आणि कुढत जगावे अशी परिस्थिती मुळीच नाही़ कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे़ प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले़.

अरुण वाघमोडे

अहमदनगर : कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मनात भीती, चिंता, नैराश्य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे़ कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भितीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञांकडील गर्दी वाढली आहे़ प्रत्यक्षात मात्र भीती घेऊन आणि कुढत जगावे अशी परिस्थिती मुळीच नाही़ कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे़ प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले़.

या परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ अमित सपकाळ, डॉ़ अश्विन झालाणी व मानसशास्त्रज्ञ प्रा़ योगिता खेडकर हे सहभागी झाले होते़ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे़ लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शारीरिक आरोग्य राखण्यासह जगण्यासाठीही संघर्ष सुरू आहे़ समाजातील अनेकांनी बदलेले हे वातावरण आत्मसात करत आपली ‘रुटीन लाईफ’ सुरू केली आहे़ बहुतांशी जणांना मात्र ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे़ अशा लोकांचा मानसिक संघर्ष सुरू आहे़ त्यांना वर्तमानासह भविष्याची चिंता सतावत आहे़ यातून डिप्रेशन निर्माण होऊन काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मानवी जीवन मात्र अनमोल आहे़ आजपर्यंत माणसाने प्रत्येक संकटावर मात करत आपले अस्तित्व सिध्द केले आहे़ आताही मनातील भीती दूर करून प्रत्येकाने कोरोनासोबत मोठ्या हिमतीने जगायला शिकावे, असा सल्ला परिसंवादातून मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे़---------

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अगदी छोट्या-छोट्या गोष्टींना लोक घाबरत आहेत़ यातून कोरोनाचे नव्हे तर भितीचे पेशंट वाढत आहे़ प्रत्यक्षात कोरोनाचा मृत्यूदर अतिशय कमी आहे़ त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी़ सोशल मीडियातून पसरणाºया अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वत:ला कामात गुंतवून घ्यावे़ कितीही अडचण असली तरी येणाºया काळात ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे़ त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोण ठेवून जगायला शिकावे़-डॉ़ अमित सपकाळ,मानसोपचार तज्ज्ञ

सकारात्मक विचार, मनमोकळा संवाद, नियमित व्यायाम, घराबाहेर पडल्यानंतर नियमांचे पालन आणि चांगला आहार ही पंचसूत्री आत्मसात केली तर कुणालाच अडचण निर्माण होणार नाही़ नको त्या बाबींचा विचार करणे, विनाकारण चिंता आणि भविष्याची सतत काळजी यातून चिडचिड निर्माण होऊन आपले आरोग्य आणि कुटुंबावरही त्याचा विपरित परिणाम होतो़ यासाठी बदल्या परिस्थितीनुसार स्वत: बदल करा, मित्र, कुटुंबीयांना समजून घ्या़ यातून प्रत्येक समस्या आणि प्रश्नाचे उत्तर मिळेल़- डॉ़ अश्विन झालाणी

कोरोना हा साथीचा आजार अथवा यामुळे निर्माण झालेली परिस्थितीही लवकर संपणारी नाही़ नव्याने ओढावलेल्या या आपत्तीमुळे सर्वांच्या जीवनावर कमी अधिक परिणाम झालेला आहे़ त्यामुळे या गोष्टींवर जास्त विचार न करता प्रत्येक अडचणीतून नव्याने वाट शोधण्याची गरज आहे़ आता काहीच शक्य नाही अथवा आत्महत्येचा विचार हा कधीच उपाय ठरू शकत नाही़ आजही प्रत्येकासाठी अनेक संधी आहेत़ दृष्टिकोन बदलून या संधीचा शोध घ्यावा़ जगण्याचा नवा नक्कीच मार्ग सापडेल़- प्रा़ योगिता खेडकर, मानसशास्त्रज्ञ