शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनो, जनतेला कोरोनाच्या मृत्युशयेवर जाण्यापासून वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST

कोपरगाव : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र गोंधळ माजला आहे. त्यातच कोपरगाव तालुक्यासारख्या ...

कोपरगाव : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र गोंधळ माजला आहे. त्यातच कोपरगाव तालुक्यासारख्या ठिकाणी देखील चित्र वेगळे नाही. येथेही बाधित रुग्णांनी हजारी पार केली असून एक-दीड महिन्यात ५० पेक्षा जास्त रुग्णांना उपचारादरम्यान सुविधांच्या अभावामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोपरगावचे आलटूनपालटून नेतृत्व करणाऱ्या काळे-कोल्हे या नेतेमंडळींनी येथील जनतेला कोरोनाच्या मृत्युशयेवर जाण्यापासून वाचवावे, अशी आर्त हाक कोपरगावकर देत आहे.

एवढ्याही प्रतिकूल परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग आपापल्या परीने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीतच आहेत. त्यातच कोपरगाव तालुक्यावर ज्या ज्यावेळी संकटे, आपत्ती, दुर्घटना, महापूर, अतिवृष्टी आली त्या त्यावेळी शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या कोसाका उद्योग समूहाने व संजीवनी उद्योग समूहाने धाव घेत जनतेच्या अनंत संकटांची सोडवणूक करण्यासाठी खमकी भूमिका घेत संकटे परतवून लावलेली आहेत. याचा इतिहास साक्षीदार आहे; परंतु गेल्या वर्षापासून तालुक्यावर आलेल्या संकटात वेगवेगळ्या प्रकारे या समूहांनी योगदान दिलेलेच आहे. मात्र, सद्य:स्थितीत या संकटाने रौद्ररूप धारण केल्याने या संकटाच्या व्यवहारात थेट जनतेच्या मृत्यूचाच सौदा होत असल्याने परिस्थिती कठीण बनली आहे.

याही परिस्थिती मागे न राहता या दोन्ही उद्योग समूहाचे नेतृत्व करणारे काळे व कोल्हे यांच्या तिसऱ्या पिढीतील शिलेदार कोपरगावच्या जनतेसाठी पुढाकार घेऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यानुसार कोसाका उद्योग समूहाचे प्रमुख व तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी ५०० बेडचे कोविड सेंटर उभारले आहे, तर संजीवनी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तालुक्याचे दुसरे युवा नेते विवेक कोल्हे हे देखील पुढाकार घेऊन ५०० बेडचे कोविड सेंटर उभारत आहेत. ही निश्चितच कोपरगावच्या जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, कोपरगावसाठी सद्य:स्थितीत जम्बो कोविड हॉस्पिटलची गरज आहे. ज्यामध्ये व्हेंटिलेटर मशीनचे बेड, आयसीयूचे बेड, ऑक्सिजन बेडची संख्या अधिक असणे गरजेचे आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा तसेच स्वतंत्र आरोग्य यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सिटीस्कॅन मशीनची देखील गरज आहे. कारण तालुक्यात सध्या कार्यरत असलेली यंत्रणा बाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यातही खासगी हॉस्पिटलच्या माध्यामतून मिळणाऱ्या उपचारातूनदेखील अनेकांचे प्राण वाचत आहे; परंतु जीव वाचविण्यासाठी लागणारा लाखोंचा पैसा प्रत्येकाकडेच नाही हेसुद्धा येथील वास्तव आहे.

त्यामुळे सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देत त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्याइतके सामर्थ्य नियतीने आपल्यासारख्या नेतेमंडळींना दिलेले आहे. त्याहून देखील महत्त्वाचे आपण मदत करणार आहातच. यामध्ये किंचितही शंका नाही. मात्र, ही मदत पंचवार्षिक योजनेनुसार न होता युद्धपातळीवर केल्या जाणाऱ्या मदतीनुसार व्हावी. कारण या संकटात आपल्याला नागरिकांचे जीव वाचवायचे आहेत. कारण, आजच्या घडीला दिवसागणिक जीव जात आहे.

..........

स्वत:ची यंत्रणा उभी करावी

शासकीय यंत्रणेच्या भरवशावर न राहून वेळ वाया न घालवता स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभी करून कोरोनाच्या मृत्युशयेवर असलेल्या कोपरगावच्या जनतेला जीवनदान मिळवून द्या, जेणेकरून हीच जनता तुमच्या पुढील राजकीय रणसंग्रामात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देत राहील.