शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या आवर्तनावर नेत्यांना मिळाला होता धोक्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी येडगाव धरणात माणिकडोह धरणातून ७०० ते ८०० एमसीएफटी पाणी सोडावे लागेल. त्यासाठी मंत्रालय ...

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी येडगाव धरणात माणिकडोह धरणातून ७०० ते ८०० एमसीएफटी पाणी सोडावे लागेल. त्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न करावे लागतील, असा धोक्याचा इशारा कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील प्रमुख नेत्यांना जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, संबंधित नेत्यांनी हा विषय त्याचवेळी गांभीर्याने घेतला नाही. आता ‘बैल गेला झोपा केला’ अशी अवस्था आहे.

कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्याला मिळाले नाही. त्यामुळे याचे तीव्र पडसाद श्रीगोंदा तालुक्यात उमटले आहेत. कुकडी आवर्तनातील ससेहोलपट थांबवायची असेल तर डिंबे माणिकडोह बोगदा प्रकल्प काळाची गरज आहे. येडगाव धरण ओव्हरफ्लो झाले झाले. ओव्हरफ्लोचे पाणी टेल टू हेड पद्धतीने सोडले. सुरुवातीला हे पाणी कर्जत तालुक्यातील शेती व तलावात सोडण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू झाले. येडगाव धरणातील पाणी पातळी खालावली असून, आवर्तन थंडावले आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबला तर, कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांचा आदेश लागेल, असे जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील नेत्यांना सूचित केले होते. त्यावर नेते मंडळींनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपली राजकीय प्रतिष्ठा वापरून माणिकडोहचे पाणी येडगावमध्ये सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय करुन घेणे आवश्यक होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही. पाटील यांनी हा विषय गांभीर्याने का घेतला नाही यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. श्रीगोंद्यात जलसंकट उभे राहिले आहे. यावर मात कशी करावी, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

...........

कालवा सल्लागार समिती बरखास्त करावी

कुकडीचे लाभक्षेत्र हे सात तालुक्याचे आहे. कुकडीच्या पाणी वाटप व नियोजनात मंत्री, खासदार, आमदार व कालवा सल्लागार समितीचे सदस्य यांचा हस्तक्षेप होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना परिस्थितीचा अंदाज योग्य येत नाही. तसेच योग्य निर्णय घेता येत नाही. निर्णय घेण्यास विलंब होतो. कुकडीच्या आवर्तनाचा बट्ट्याबोळ होत आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समिती बरखास्त करुन पाणी वाटप व नियोजन सर्व अधिकार अधिकाऱ्यांना देण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून पुढे आल्या आहेत.