शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कुकडीच्या आवर्तनावर नेत्यांना मिळाला होता धोक्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी येडगाव धरणात माणिकडोह धरणातून ७०० ते ८०० एमसीएफटी पाणी सोडावे लागेल. त्यासाठी मंत्रालय ...

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी येडगाव धरणात माणिकडोह धरणातून ७०० ते ८०० एमसीएफटी पाणी सोडावे लागेल. त्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न करावे लागतील, असा धोक्याचा इशारा कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील प्रमुख नेत्यांना जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, संबंधित नेत्यांनी हा विषय त्याचवेळी गांभीर्याने घेतला नाही. आता ‘बैल गेला झोपा केला’ अशी अवस्था आहे.

कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्याला मिळाले नाही. त्यामुळे याचे तीव्र पडसाद श्रीगोंदा तालुक्यात उमटले आहेत. कुकडी आवर्तनातील ससेहोलपट थांबवायची असेल तर डिंबे माणिकडोह बोगदा प्रकल्प काळाची गरज आहे. येडगाव धरण ओव्हरफ्लो झाले झाले. ओव्हरफ्लोचे पाणी टेल टू हेड पद्धतीने सोडले. सुरुवातीला हे पाणी कर्जत तालुक्यातील शेती व तलावात सोडण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू झाले. येडगाव धरणातील पाणी पातळी खालावली असून, आवर्तन थंडावले आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबला तर, कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांचा आदेश लागेल, असे जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील नेत्यांना सूचित केले होते. त्यावर नेते मंडळींनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपली राजकीय प्रतिष्ठा वापरून माणिकडोहचे पाणी येडगावमध्ये सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय करुन घेणे आवश्यक होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही. पाटील यांनी हा विषय गांभीर्याने का घेतला नाही यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. श्रीगोंद्यात जलसंकट उभे राहिले आहे. यावर मात कशी करावी, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

...........

कालवा सल्लागार समिती बरखास्त करावी

कुकडीचे लाभक्षेत्र हे सात तालुक्याचे आहे. कुकडीच्या पाणी वाटप व नियोजनात मंत्री, खासदार, आमदार व कालवा सल्लागार समितीचे सदस्य यांचा हस्तक्षेप होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना परिस्थितीचा अंदाज योग्य येत नाही. तसेच योग्य निर्णय घेता येत नाही. निर्णय घेण्यास विलंब होतो. कुकडीच्या आवर्तनाचा बट्ट्याबोळ होत आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समिती बरखास्त करुन पाणी वाटप व नियोजन सर्व अधिकार अधिकाऱ्यांना देण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून पुढे आल्या आहेत.