शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात नेते धन्यता मानतात :साहित्यिक चंद्रकांत पालवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:50 IST

निवडणुकीत वैचारिक मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा विविध पक्षांतील नेते एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात धन्यता मानत आहेत़

अरुण वाघमोडेअहमदनगर : निवडणुकीत वैचारिक मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा विविध पक्षांतील नेते एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात धन्यता मानत आहेत़ अशा परिस्थितीत मतदारांनी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करावे असे मत ज्येष्ठ कवी व साहित्यिक चंद्रकांत पालवे यांनी व्यक्त केले़एक साहित्यिक म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?पालवे: लोकशाहीत मतदान ही प्रक्रिया अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते़ सर्वांनी शांततेत मतदान करावे़ सध्या प्रचाराच्या निमित्ताने राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत़ गेल्या काही वर्षांत राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे़ निवडून येण्यासाठी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत़ नगरमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने एकेकाळी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या़ त्यावेळी वैचारिक मुद्यांवर निवडणूक लढविली जायची़ सध्या मात्र वैचारिकतेला तिलांजली देत एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यातच राजकीय नेते धन्यता मानत आहेत़लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?पालवे: सध्या देशातील परिस्थिती पाहिली तर सुशिक्षित बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवरचे विषय आहेत़ आज उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना अत्यल्प पगारावर कुठेतरी काम करावे लागत आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत़ निवडणुकीत हे मुद्दे केंद्रस्थानी असायला हवेत़ गेल्या काही वर्षांत प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेत का? आणि येणाºया काळात हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काय नियोजन आहे़ यावर चर्चा होणे गरजेचे आहे़ जनतेनेही विकासाचे मुद्दे विचारात घेऊनच आपल्या मतदानाचा हक्क बजवावा़तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?पालवे: मी साहित्य परिषदेवर काम करतो तसा एक ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सरकारी नोकर आहे़ त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील प्रश्नांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला आहे असे वाटत नाही़ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून एक लाख स्वाक्षºयांचे निवेदन पंतप्रधानांना दिले तसेच नगरचे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे व सदानंद मोरे यांनी याबाबत मोठा अहवाल सादर केलेला आहे़ या मागणीवर मात्र अद्यापपर्यंत विचार झालेला दिसत नाही़ ज्यांनी सरकारी खात्यात प्रामाणिकपणे सेवा केली अशा अनेक सेवानिवृत्तांना योग्य निवृत्तीवेतन मिळत नाही़ देशातील सध्या ६० लाख सेवानिवृत्तांचा प्रश्न आहे़नवीन मतदारांना काय आवाहन कराल?सध्या देशात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे़ हा मतदारच येणारे सरकार ठरविणार आहे़ त्यामुळे तरुणांनी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करावे़ कुठल्याही भूलथापांना बळी न पडता तरुणांनी कोणत्या उमेदवारांना विकासाची जाण आहे हे समजून घेऊन तरुणांनी मतदान करावे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019