शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात नेते धन्यता मानतात :साहित्यिक चंद्रकांत पालवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:50 IST

निवडणुकीत वैचारिक मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा विविध पक्षांतील नेते एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात धन्यता मानत आहेत़

अरुण वाघमोडेअहमदनगर : निवडणुकीत वैचारिक मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा विविध पक्षांतील नेते एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात धन्यता मानत आहेत़ अशा परिस्थितीत मतदारांनी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करावे असे मत ज्येष्ठ कवी व साहित्यिक चंद्रकांत पालवे यांनी व्यक्त केले़एक साहित्यिक म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?पालवे: लोकशाहीत मतदान ही प्रक्रिया अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते़ सर्वांनी शांततेत मतदान करावे़ सध्या प्रचाराच्या निमित्ताने राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत़ गेल्या काही वर्षांत राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे़ निवडून येण्यासाठी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत़ नगरमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने एकेकाळी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या़ त्यावेळी वैचारिक मुद्यांवर निवडणूक लढविली जायची़ सध्या मात्र वैचारिकतेला तिलांजली देत एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यातच राजकीय नेते धन्यता मानत आहेत़लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?पालवे: सध्या देशातील परिस्थिती पाहिली तर सुशिक्षित बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवरचे विषय आहेत़ आज उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना अत्यल्प पगारावर कुठेतरी काम करावे लागत आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत़ निवडणुकीत हे मुद्दे केंद्रस्थानी असायला हवेत़ गेल्या काही वर्षांत प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेत का? आणि येणाºया काळात हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काय नियोजन आहे़ यावर चर्चा होणे गरजेचे आहे़ जनतेनेही विकासाचे मुद्दे विचारात घेऊनच आपल्या मतदानाचा हक्क बजवावा़तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?पालवे: मी साहित्य परिषदेवर काम करतो तसा एक ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सरकारी नोकर आहे़ त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील प्रश्नांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला आहे असे वाटत नाही़ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून एक लाख स्वाक्षºयांचे निवेदन पंतप्रधानांना दिले तसेच नगरचे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे व सदानंद मोरे यांनी याबाबत मोठा अहवाल सादर केलेला आहे़ या मागणीवर मात्र अद्यापपर्यंत विचार झालेला दिसत नाही़ ज्यांनी सरकारी खात्यात प्रामाणिकपणे सेवा केली अशा अनेक सेवानिवृत्तांना योग्य निवृत्तीवेतन मिळत नाही़ देशातील सध्या ६० लाख सेवानिवृत्तांचा प्रश्न आहे़नवीन मतदारांना काय आवाहन कराल?सध्या देशात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे़ हा मतदारच येणारे सरकार ठरविणार आहे़ त्यामुळे तरुणांनी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करावे़ कुठल्याही भूलथापांना बळी न पडता तरुणांनी कोणत्या उमेदवारांना विकासाची जाण आहे हे समजून घेऊन तरुणांनी मतदान करावे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019