शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आल्यानंतर एलबीटी हद्दपार

By admin | Updated: October 2, 2014 00:33 IST

अहमदनगर : भाजपाचे सरकार आल्यानंतर राज्यातून एलबीटी हद्दपार करू, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले.

अहमदनगर : आघाडी सरकारने शहरांकडे पैसे कमविण्याचे मशिन म्हणून पाहिले. त्यामुळेच राज्यातील शहरे बकाल झाली आहेत. जकात रद्द करून मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर एलबीटीचे भूत बसविले. त्यांच्या ‘इगो’मुळे एलबीटी रद्द झाला नाही. भाजपाचे सरकार आल्यानंतर राज्यातून एलबीटी हद्दपार करू, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले.भाजपाचे नगर शहर मतदारसंघातील उमेद्वार अ‍ॅड. अभय आगरकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, संघटन मंत्री विठ्ठल चाटे, सुनील रामदासी आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर नगर शहराच्या विकास आराखड्यासाठी राज्य आणि केंद्राकडून पैसा उपलब्ध करून दिला जाईल. परदेशातील गुंतवणूकही नगरमध्ये आणता येईल. पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे आॅडिट होईल. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराला चालना देऊन शहराची दुरावस्था बदलण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नगरच्या तरुणांना रोजगारासाठी पुणे-मुंबईला जावे लागले. त्यामुळे नगर पेन्शनरांचे शहर झाले आहे. शिक्षण हा हजारो कोटी रुपयांचा उद्योग बनला आहे. महर्षी गेले आता डिग्रीचे कारखाने काढून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सम्राट झाले आहेत.साठ वर्षे ज्यांनी देशाला लुटले ते शंभर दिवसांचा हिशेब मागत आहेत. आघाडी सरकारने राज्याला फक्त बेरोजगारी, गुन्हेगारी आणि आत्महत्या दिल्या आहेत. मोदी सरकार आल्यापासून महगाईवर काबू ठेवण्यात यश आले आहे. जगाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेला पंतप्रधान देशाला मिळाला आहे, असे सांगून फडवणीस यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारचे व्हीजन सविस्तरपणे मांडले. (प्रतिनिधी)काँग्रेस ‘लुना पार्टी’ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडताना राष्ट्रवादी काँग्रेस नॅनो पार्टी होईल, असे भाकित फडणवीस यांनी नगरमध्ये केले होते. त्याची आठवण सांगताना फडणवीस म्हणाले, नगरमध्ये जे बोलले जाते ते खरे होते. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेत इनोव्हाची ‘नॅनो पार्टी’ झाली, तर काँग्रेस ‘लुना पार्टी’झाली. आता नगरचा आमदारही भाजपाचाच असेल.