शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ऑक्सिजनअभावी आमचे बाबा गेले, सासरे गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST

---------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : माझ्या वडिलांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या रुग्णालयात ...

----------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : माझ्या वडिलांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई होती. त्यामुळे त्या रुग्णालयाने आमच्या वडिलांना इतरत्र हलविण्यास सांगितले. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. त्यावेळी रुग्णवाहिकेत जेवढा ऑक्सिजन होता, तेवढाच मिळाला. नंतर रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने वडिलांचा जीव गेला, असा खेद विनोद नलवडे यांनी व्यक्त केला.

देशात ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू झाला नाही, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गत आठवड्यात केले होते. त्यामुळे ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी गेले, त्यांनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. ऑक्सिजनअभावी कोणाचेच मृत्यू झाले नाहीत, असे सरकार सांगत आहे. मात्र आमचे बाबा, आमचे सासरे, आमच्या मित्रांचे वडील ऑक्सिजनअभावीच गेले. मग हे खोटे आहे का? ही झाली काही उदाहरणे, मात्र ऑक्सिजन न मिळालेल्या कितीतरी लोकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र ते काही कोणी रेकॉर्डवर घेतलेले नाहीत, असे रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ला सांगितले. नगर शहरातील एका रुग्णालयात तर ऑक्सिजन न मिळाल्याने एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याचाही प्रकार घडला होता. मात्र तो प्रशासकीय पातळीवरून मान्य करण्यात आला नाही. एप्रिल-मे २०२१ मध्ये ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांचे जीव गेले. ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांनाच खूप मोठी धावपळ करावी लागली. सरकारी यंत्रणेकडून ऑक्सिजन मिळालेच नाहीत. एमआयडीसी कंपन्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली. त्यामुळे अनेक नागरिकांना प्राणास मुकावे लागले.

--------------

त्या दिवशी काय घडले...

माझ्या मित्रांचे वडील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने इतरत्र हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही व इतर नातेवाईक यांनी एमआयडीसी गाठून ऑक्सिजनचे सिलिंडर आणले. कोणताही आजार नसताना ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यामुळे आम्ही सगळे चिंताग्रस्त होतो. ऑक्सिजन कसाबसा आणला, मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

-संतोष ढगे, विसापूर

-------------

नगर शहरात एका खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले होते. तिथे ऑक्सिजनची मोठी टंचाई होती. त्यांना इतर ठिकाणी दाखल करायचे म्हटल्यावर आमच्या अंगावर काटाच आला. २७ एप्रिल २०२१ चा तो दिवस होता. ऑक्सिजन असते तर आमचे वडील वाचले असते. सरकार सांगत आहे की ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू झाला नाही, मात्र प्रत्यक्ष काय झाले होते, हे सरकारने कुठे पाहिले?

-विनोद नलावडे, मुलगा

--------------

ऑक्सिजनअभावी कितीतरी कोरोना रुग्णांचा प्राण गेला आहे. मात्र त्याची नोंद कुठेच आढळत नाही. दिवस-रात्र रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ करीत होते. ऑक्सिजन सिलिंडर मिळेपर्यंत अनेक जणांचा जीव गेला आहे. मात्र केंद्र सरकार एकही मृत्यू झाला नसल्याचे सांगत आहे.

-नितीन भुतारे, नागरिक

------------

एप्रिल-मे या दोन महिन्यात तर ऑक्सिजन सिलिंडरसाठी शेकडो फोन आले. मदतीसाठी अनेकांनी याचना केली. खासगी दवाखान्यांनी तर ऑक्सिजन नसल्याने तुमचे रुग्ण आमच्या येथून हलवा, असेच सांगत होते. त्यामुळे प्रशासन, रुग्णालये यांच्याऐवजी रुग्णांच्या नातेवाईकांनाच ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागली. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले, ही सत्य परिस्थिती आहे.

-अभय आगरकर, माजी नगराध्यक्ष

-------

कोरोना स्थिती

एकूण रुग्ण

बरे झालेले

उपचार घेणारे

मृत्यू