शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी नगरकरांचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST

अहमदनगर : शहरात सध्या उड्डाणपुलासह भुयारी गटार योजना, महावितरणचे भूमिगत केबल आणि फेज - २ची कामे सुरू आहेत. ...

अहमदनगर : शहरात सध्या उड्डाणपुलासह भुयारी गटार योजना, महावितरणचे भूमिगत केबल आणि फेज - २ची कामे सुरू आहेत. हे कमी म्हणून काय दिल्ली गेट ते नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रोडच्या रस्त्याचे कामही महापालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे ‘विकास लयी झाला आता बस्स करा’, असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.

येथील सक्कर चौक ते अशोका हाॅटेलपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला आहे. हे काम रस्त्याच्या मध्यभागी कठडे उभे करून सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जुने बसस्थानक ते जीपीओ चौकापर्यंतच्या मार्गावर वाहतूक कोंडी होते. दुचाकी व चारचाकी वाहने सर्रास याच मार्गाने शहरात येतात. त्यामुळे शहरात वाहनांची एकदम गर्दी होत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट रस्त्याचे काम सुरू केले. हे काम सुरू असल्याने वाहने बालिकाश्रम रोडवरून पुढे जात होती. परंतु, बालिकाश्रम रोड ज्या चौकातून सुरू होतो, तेथील रस्ताही जेसीबीच्या सहाय्याने खोदण्यात आला आहे. हे काम महापालिकेने मंगळवारी सुरू केले. त्यात नेप्ती नाका ते दिल्ली गेट रस्त्याच्या काॅंक्रिटीकरणाचेही काम महापालिका हाती घेणार आहे. हे काम रात्री केले जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. परंतु, ही सर्व कामे एकाचवेळी सुरू झाल्याने दिल्ली गेट परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे.

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने चांदणी चौकातून वाहने जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे येतात. परंतु, हा रस्ताही भुयारी गटाराच्या कामासाठी खोदण्यात आलेला आहे. तेथून कोठल्याकडे जाणाऱा रस्ता महावितरणने भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदला असून, या मार्गावर भुयारी गटार, फेज - २ची कामे सुरू असून, ही कामे करणाऱ्या ठेकेदारांमध्ये समन्वय नाही. या कामावर महापालिकेचे नियंत्रण आहे. परंतु, महापालिकेनेही या कामाचे नियोजन केलेले नाही. वाटेल तिथे रस्ता खोदला जात असल्याने शहरातून प्रवास करणे कठीण झाले असून, सर्वत्र धूळ उडत आहे. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत.

....

आमदार, महापौरांचे मौन

शहराचा नियोजनबद्ध विकास करणार असल्याचे शहरातील सर्वच नेते भाषणातून सांगत असतात. परंतु, विकास करताना त्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्याचा त्रास नगरकरांना होत असून, नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरातील आमदार, महापौरांसह नगरसेवकही मौन बाळगून असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.