शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षकांचे घंदानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 15:38 IST

राज्य सरकारच्या सेवेत २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योेजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देजुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी
अहमदनगर : राज्य सरकारच्या सेवेत २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योेजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जुनी पेन्शन सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी घंदानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संघटनेचे विश्वस्त बाजीराव मोढवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, जिल्हासरचिटणीस भाऊसाहेब पाचारणे, कार्याध्यक्ष सचिन लाबगे, कोषाध्यक्ष अमोल सोनवणे, राज्य निरीक्षक वृंदा तेलोरे, शैलेश खणकर, मुकुंद कुलांगे, ऋषिकेश गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक आंदोलनात उतरले आहेत. जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत ३१ आॅक्टोबर २००५ नंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ या अंतर्गत असलेली पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. ही योजना बंद करुन नवीन परिभाषित अंशदायी योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र ही योजना कर्मचा-यांचे भविष्य अंधकारात टाकणारी आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र तीन महिने उलटून गेले असून कोणतीही कार्यवाही झाली नाही. शिक्षकांची हक्काची वरीष्ठ वेतनश्रेणीही शिक्षकांकडून हिरावून घेतली आहे. आज शिक्षक शाळा प्रगत व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या कामासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. वरीष्ठ वेतनश्रेणीचा अनेक शिक्षकांवर जाचक अटीमुळे अन्याय होत आहे. अनेक शिक्षक स्वत: लोकवर्गणी गोळा करुन शाळा डिजिटल व प्रगत करत आहेत. त्यामुळ्े महाराष्ट्रातील हजारो शाळा आयएसओ नामांकित झाल्या आहेत. अशा कामासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी शासन अन्यायकारक भुमिका घेत आहे. २३ आॅक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीबाबत शासनाला जाग यावी यासाठी घंटानाद आंदोलन करत आहोत. तरी शासनाने अन्यायकारक धोरणे रद्द करुन जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगर