शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

हिरण यांची हत्या हे गृह विभागाचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून विधानसभेत भारतीय जनता पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर ...

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून विधानसभेत भारतीय जनता पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही गृह विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवत हिरण यांची हत्या हे गृह विभागचे अपयश असून, या घटनेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने निवेदन सादर करण्याची मागणी केली.

अधिवेशनात दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी हिरण यांच्या हत्येचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी यावेळी घटनेचा काही तपशील मांडला. सोमवारी विखे यांनी गृह खात्याचे सरकारवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस सामान्यांवर धाक दाखवत आहेत. मात्र गुंड मोकाट फिरत असल्याचे ते म्हणाले.

पोलिसांच्या कामगिरीवर आमचा आक्षेप नाही. मात्र मूठभर लोकांमुळे गृह खाते बदनाम होत आहे. हिरण यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आता मागे जाता येणार नाही. मात्र पुढील काळात अशा प्रकारची कोणतीही घटना घडता कामा नये याची खबरदारी घेतली जावी, असे विखे म्हणाले.

..........

हिरण स्वातंत्र्यसैनिक कुटुंबातील

हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला व्यापाऱ्यांनी सर्व माहिती दिली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याबाबत गांभीर्य दाखविले गेले नाही. हिरण यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे अशा कुटुंबातील व्यक्तीची हत्या खेदनजनक आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावावा. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर निवेदन सादर करावे, अशी मागणी अशी विखे यांनी केली.