शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

१४ कोटी रुपयांचा अपहार : श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणेंसह ७ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:59 IST

२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पालिकेने भुयारी गटार योजनेसाठी शहरातील दक्षिण भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना बिले अदा केली

श्रीरामपूर : शहरातील भुयारी गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १४ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह दोन मुख्याधिकाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरया फौंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजश्री ससाणे (तत्कालीन नगराध्यक्ष), गणपतराव मोरे (तत्कालीन मुख्याधिकारी), संतोष महादेव खांडेकर (तत्कालीन मुख्याधिकारी), सूर्यकांत मोहन गवळी (बांधकाम अभियंता), राजेंद्र विजय सुतावणे (तत्कालीन बांधकाम अभियंता), ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग (कोल्हापूर) व दशसहस्त्र सोल्युशन (ठाणे) यांचा समावेश आहे.२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पालिकेने भुयारी गटार योजनेसाठी शहरातील दक्षिण भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना बिले अदा केली. उत्तरेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच आवश्यक असणाºया यांत्रिकी व विजेच्या कामाची बिले अदा केली. नागरिक व सरकारची फसवणूक करुन खोटे व बनावट बिले बनवून सुमारे १३ कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद खोरे यांनी दिली आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर