शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

अपहरण झालेली मुले पुण्यात सापडली

By admin | Updated: March 13, 2016 23:58 IST

अहमदनगर : खासगी क्लासला न जाता तिन्ही मुले रेल्वेतून दौंडला आणि तेथून पुण्यात गेली. पुण्याजवळील केतकावळे येथे प्रतिबालाजीचे दर्शन घेवून पुन्हा पुण्यात परतली.

अहमदनगर : खासगी क्लासला न जाता तिन्ही मुले रेल्वेतून दौंडला आणि तेथून पुण्यात गेली. पुण्याजवळील केतकावळे येथे प्रतिबालाजीचे दर्शन घेवून पुन्हा पुण्यात परतली. तेथून त्यांनी हैदराबादला जाण्याची योजना आखली. मात्र मुलांचा शोध करणाऱ्या नातेवाईकांनी तीन मुलांना रेल्वे स्टेशनवर पाहिले आणि नगरला कळविले. नगरच्या पोलिसांनी पुण्याच्या पोलिसांमार्फत त्यांना ताब्यात घेतले आणि दुपारी नगरला आणले. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिन्ही मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपविले. मुलांच्या अपहरणनाट्याने मात्र पोलीस अधिकारी चांगलेच घामाघूम झाले होते.एका खासगी क्लासला जाणारी तीन शाळकरी मुले शुक्रवारी दुपारी एक वाजता नगर शहरातील महाजन गल्लीतून गायब झाली होती. तेजस संभाजी निमसे (वय १४, रा. मांडवे, ता. नगर), अभिषेक चंद्रकांत म्याना (वय १४, रा. भराडगल्ली, तोफखाना) आणि विशाल रवींद्र जाधव (वय १४, रा. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक) अशी त्या मुलांची नावे आहेत. मुलांच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. १४ वर्षे वयाची मुले असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, संदीप पाटील यांनी अथक परिश्रम करून रविवारी सकाळपर्यंत मुलाचा शोध लावला.तिन्ही मुलांनी पुण्याचे तिकीट काढल्याची माहिती पोलिसांना नगरच्या रेल्वे स्थानकावरच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी दौंड आणि पुणे रेल्वे स्थानकावर मुलांचा कसून शोध घेतला. नगर रेल्वे स्थानकावर विशाल जाधवचा नातेवाईक असलेल्या एका पोस्टमास्तरने मुले रेल्वेस्थानकात आल्याचे पाहिले होते. मात्र ती कोणत्या रेल्वेत बसली, याबाबत त्यांना माहिती नव्हती. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून रेल्वे स्थानकावर शोध सुरू ठेवला. मुलांची छायाचित्रे व्हॉटस् अ‍ॅपवरून प्रसारित केली. दौंड जंक्शन, पुणे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. मात्र तिथे शोध लागला नाही. दरम्यान, शोध घेणाऱ्या मुलांच्या नातेवाईकांना तिन्ही मुले रविवारी सकाळी पुणे रेल्वेस्थानकावर आढळून आली. तसेच विशाल जाधव याने त्याच्या मामाला मोबाईलद्वारे पुण्याच्या रेल्वेस्थानकावर आल्याची माहिती दिली. त्यानंतर नगरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मुलांना पुण्यातून ताब्यात घेतले. ही मुले दुपारी नगरला आणल्यानंतर त्यांना रात्री पालकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)हैदराबादला जाण्याचा बेततिघांपैकी तेजस निमसे याच्याकडे तीन हजार रुपये होते. तोच मास्टरमार्इंड होता. त्यानेच पुण्याला जाण्याची योजना आखली. घरच्यांना सांगून पुण्याला जायचे ठरविले असते तर घरचे रागावले असते, यामुळे त्यांनी घरी न सांगता शुक्रवारी दुपारीच पुण्याला जायचा बेत आखला. गोवा-निजामाबाद एक्सप्रेसने आधी दौंड, नंतर पुणे, तेथून केतकावळे येथे जावून बालाजीचे दर्शन घेतले. शनिवारची रात्र रेल्वेस्टेशनवरच काढली. रविवारी सकाळी हैदराबादला जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र नातेवाईकांनी पाहिल्याने त्यांचा बेत हुकला. ‘पैसे संपल्याने आम्ही नगरकडेच निघालो होतो. रविवारी येणार होतो. पुणे येथे जावून परत यायचे होते. त्यामुळे घरच्यांना सांगितले नाही’, असे तिन्ही मुलांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, तिघांपैकी एकाने यापूर्वी दोनवेळा घरी न सांगता गायब होण्याचा पराक्रम केला होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. तिन्ही मुले नगरमधील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिकत असून महाजन गल्लीतील खासगी क्लासमुळे त्यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे.