शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

खरीप हंगाम धोक्यात

By admin | Updated: July 17, 2014 00:30 IST

शेवगाव : तालुक्यात लागोपाठ दुसऱ्या वषीर्ही पावसाने ओढ दिल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याच्या संकटाने उग्र स्वरुप धारण केले आहे.

शेवगाव : तालुक्यात लागोपाठ दुसऱ्या वषीर्ही पावसाने ओढ दिल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याच्या संकटाने उग्र स्वरुप धारण केले आहे. तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. पेरण्याच न झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे.पावसाळ्याची पहिली तीनही नक्षत्रे कोरडी गेली आहेत. तालुक्यातील २५ गावे व ९७ वाड्या,वस्त्यांना पावसाळ्यातही २५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्याची जीवनरेखा ठरलेल्या जायकवाडी जलाशयात जेमतेम तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील शेवगाव-पाथर्डी व ५४ गावे, शहरटाकळी व २८ गावे, बोधेगाव, बालमटाकळीसह ८ गावे तसेच हातगाव व २५ गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात आले आहे.शासनाने जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीत शेवगाव तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेवगाव तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण ६७ ते ६८ टक्के कमी असताना तालुक्याचा टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश व्हावा यासाठी पालकमंत्री मधुकर पिचड यांचे लक्ष वेधल्याची माहिती आमदार चंद्रशेखर घुले यांनी टंचाई आढावा बैठकीत दिली. (प्रतिनिधी)नियोजनाविषयी सूचनादुष्काळाचे संकट लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाने आपत्कालीन आराखडा तयार करावा, तहानलेल्या गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, जनावरांच्या छावण्या तसेच शेतकऱ्यांना दावणीला चारा उपलब्ध होईल या पद्धतीने तातडीने नियोजन हाती घेण्याच्या सूचना तालुका प्रशासनास देण्यात आल्या आहेत. अर्थकारण ठप्प !रोज पावसाळी वातावरण तयार होते. मात्र, त्यानंतर जोराचे वारे वाहून ढग पांगतात. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतीसह सर्वच क्षेत्रांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. बाजारपेठेतही उलाढाल नसल्याने शुकशुकाट आहे.