शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दहशतवाद विरोधी दिवस/‘कोरोना’च्या दहशतीविरोधात खाकीतला वॉरिअर्स लढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:53 IST

अहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.विस्ताराने महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याची आज ५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सध्या जिल्ह्यात मात्र अवघे ३२०० पोलीस कार्यरत आहेत. यात वयाची पन्नाशी ओलांडणारे एक हजारच्या आसपास पोलीस आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ८०० पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यातील काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. जनतेच्या संरक्षणासाठी मात्र या आजाराची भीती दूर सारून जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस दररोज सकाळी ड्युटीसाठी घराबाहेर पडत आहे. कामाचा ताण वाढल्याने अनेक ठिकाणी पोलिसांना तब्बल सोळा ते अठरा तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे. गर्दी कमी करणे, वाहनांची तपासणी, स्थलांतरितांना सुरक्षित पोहोचविणे, विविध ठिकाणी बंदोबस्त, अवैध व्यवसायांवर कारवाई अशी एक ना अनेक कामे सध्या पोलिसांना आहेत. रस्त्यावर आॅन ड्युटी चोवीस तास उभा राहणाºया पोलिसांमुळे कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.----

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने नगर जिल्ह्याला बाहेरचा बंदोबस्त मिळालेला नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळातच कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाºयांना फिल्डवरती काम न देता कार्यालयीन काम देण्यात आलेले आहे. वैद्यकीय उपचारासाठी ज्यांना रजेची गरज आहे, त्या कर्मचाºयांना रजा देण्यात आलेली आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे आपले कर्तव्य निभावत आहेत.    

- डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक