शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

दहशतवाद विरोधी दिवस/‘कोरोना’च्या दहशतीविरोधात खाकीतला वॉरिअर्स लढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:53 IST

अहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.विस्ताराने महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याची आज ५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सध्या जिल्ह्यात मात्र अवघे ३२०० पोलीस कार्यरत आहेत. यात वयाची पन्नाशी ओलांडणारे एक हजारच्या आसपास पोलीस आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ८०० पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यातील काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. जनतेच्या संरक्षणासाठी मात्र या आजाराची भीती दूर सारून जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस दररोज सकाळी ड्युटीसाठी घराबाहेर पडत आहे. कामाचा ताण वाढल्याने अनेक ठिकाणी पोलिसांना तब्बल सोळा ते अठरा तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे. गर्दी कमी करणे, वाहनांची तपासणी, स्थलांतरितांना सुरक्षित पोहोचविणे, विविध ठिकाणी बंदोबस्त, अवैध व्यवसायांवर कारवाई अशी एक ना अनेक कामे सध्या पोलिसांना आहेत. रस्त्यावर आॅन ड्युटी चोवीस तास उभा राहणाºया पोलिसांमुळे कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.----

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने नगर जिल्ह्याला बाहेरचा बंदोबस्त मिळालेला नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळातच कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाºयांना फिल्डवरती काम न देता कार्यालयीन काम देण्यात आलेले आहे. वैद्यकीय उपचारासाठी ज्यांना रजेची गरज आहे, त्या कर्मचाºयांना रजा देण्यात आलेली आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे आपले कर्तव्य निभावत आहेत.    

- डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक