शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

आता दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:49 IST

२०११ च्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे राजकारणात जाता येणार नाही. त्यामुळे दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

ठळक मुद्देराज्यातील कार्यकर्त्यांचे राळेगणमध्ये शिबिर आंदोलनात सहभागासाठी राजकारण न जाण्याचं द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : २०११ च्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे राजकारणात जाता येणार नाही. त्यामुळे दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती, शेतीमालाला हमीभाव, निवडणूक सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्च रोजी शहीद दिनापासून दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल या आंदोलनाचे नियोजन व प्रचार व प्रसार त्यांनी कसा करावयाचा? यासाठी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिर परिसरात महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांचे मंगळवारी एकदिवसीय शिबीर पार पडले.मी देशातील २२ राज्यात आंदोलनाच्या जनजागृतीसाठी दौरे केले. तेथे सभांना मोठा प्रतिसाद मिळाला असून लाखो लोक आंदोलनाशी जोडले गेले आहेत. हा समाज देशाच्या दृष्टीने एक आशेचा किरण आहे. १८५७ ते १९४७ या काळात लाखो देशभक्तांच्या बलिदानातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्थेत भ्रष्टाचार, गुंडागर्दी वाढली आहे. सरकार जनतेची तिजोरी लुटत आहे. अलिकडच्या काळात काही करून सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र सुरू असल्याचे दिसून येते. सत्ता व पैशांच्या नशेत राजकारणी धुंद झाले आहेत. समाज व राष्ट्राला आपण कुठे घेऊन चाललो आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही. यामुळे समाज व देशाच्या भल्यासाठी अनेक लोक राजकारणापासून हळूहळू दूर होत आहेत, असेही अण्णा हजारे यावेळी म्हणाले.शिबारीसाठी बालाजी कोमपलवार, अशोक सब्बन, शाम असावा, अल्लाउद्दीन शेख, डॉ. शिवनाथ कुंभारे, सरपंच रोहिणी गाजरे, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, संजय पठाडे, राजाराम गाजरे, श्याम पठाडे, दत्ता आवारी, अमोल झेंडे, कल्पना इनामदार आदींसह महाराष्ट्रातून ४०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरanna hazareअण्णा हजारे