शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:49 IST

२०११ च्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे राजकारणात जाता येणार नाही. त्यामुळे दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

ठळक मुद्देराज्यातील कार्यकर्त्यांचे राळेगणमध्ये शिबिर आंदोलनात सहभागासाठी राजकारण न जाण्याचं द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : २०११ च्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे राजकारणात जाता येणार नाही. त्यामुळे दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती, शेतीमालाला हमीभाव, निवडणूक सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्च रोजी शहीद दिनापासून दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल या आंदोलनाचे नियोजन व प्रचार व प्रसार त्यांनी कसा करावयाचा? यासाठी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिर परिसरात महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांचे मंगळवारी एकदिवसीय शिबीर पार पडले.मी देशातील २२ राज्यात आंदोलनाच्या जनजागृतीसाठी दौरे केले. तेथे सभांना मोठा प्रतिसाद मिळाला असून लाखो लोक आंदोलनाशी जोडले गेले आहेत. हा समाज देशाच्या दृष्टीने एक आशेचा किरण आहे. १८५७ ते १९४७ या काळात लाखो देशभक्तांच्या बलिदानातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्थेत भ्रष्टाचार, गुंडागर्दी वाढली आहे. सरकार जनतेची तिजोरी लुटत आहे. अलिकडच्या काळात काही करून सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र सुरू असल्याचे दिसून येते. सत्ता व पैशांच्या नशेत राजकारणी धुंद झाले आहेत. समाज व राष्ट्राला आपण कुठे घेऊन चाललो आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही. यामुळे समाज व देशाच्या भल्यासाठी अनेक लोक राजकारणापासून हळूहळू दूर होत आहेत, असेही अण्णा हजारे यावेळी म्हणाले.शिबारीसाठी बालाजी कोमपलवार, अशोक सब्बन, शाम असावा, अल्लाउद्दीन शेख, डॉ. शिवनाथ कुंभारे, सरपंच रोहिणी गाजरे, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, संजय पठाडे, राजाराम गाजरे, श्याम पठाडे, दत्ता आवारी, अमोल झेंडे, कल्पना इनामदार आदींसह महाराष्ट्रातून ४०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरanna hazareअण्णा हजारे