शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विद्यमान सरपंचांनाच निवडणूक होईपर्यंत पदावर ठेवा; सरपंच परिषदेची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:44 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच पदावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणूक निर्णय होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

अहमदनगर : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सरकारने सुरु केल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच पदावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणूक निर्णय होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका मार्च ते जूनपर्यंत होणे अपेक्षित होते. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण झाल्यानंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारने हालचाली चालू केल्या आहेत. पुढील टप्प्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले आहे. 

कोरोना निर्मुलनामध्ये ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची आहे. गावातील सरपंच, उपसरंपच, सदस्य गावात चांगले काम करीत आहेत. मात्र, आता राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्यास मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना निवडणूक निर्णय होईपर्यंत त्याच पदावर कायम ठेवावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्ता काकडे, महिला राज्याध्यक्षा राणीताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड़ विकास जाधव आदींनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरElectionनिवडणूक 2024gram panchayatग्राम पंचायत