शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

काटवन खंडोबा रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:10 IST

काटवन खंडोबा ते आगरकर मळा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे रस्त्यावर चिखल साचला आहे.

अहमदनगर : काटवन खंडोबा ते आगरकर मळा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. याचा शालेय विद्यार्थी, रुग्णांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागतो. महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा नगरसेवकांना विसर पडल्याचे या परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.आयुर्वेद चौकाच्या उजव्या बाजूने काटवन खंडोबा रोड कमान ते आगरकर मळा स्वीट कॉर्नर हा आता वर्दळीचा रस्ता झाला आहे. सीना नदीच्या पुलावरून ते संजयनगर झोपडपट्टी ते आगरकर मळा असा हा रस्ता जातो.दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले. त्यानंतर इथे रस्ताच झाला नाही. सध्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सीना नदीच्या पुलावरही खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमधील पाणी रस्त्यावर आलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चिखल झालेला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून जात असल्याने रस्ता खराब झाला आहे. रात्रीच्यावेळी तर या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे़ खराब रस्त्यामुळे येथे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे़ दोनवेळी महापालिका निवडणुकीत अनेकांनी आश्वासने दिली, मात्र रस्त्याचे काम झाले नाही, नेते येतात आणि केवळ आश्वासने देऊन जातात प्रत्यक्षात पाठपुरावा कुणाकडूनही होत नाही़ असे येथील नागरिक सांगतात.सदरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. सिमेंट काँक्रिटचे काम ३० लाख रुपये खर्चाचे आहे. आचारसंहितेचे कारण देऊन अद्याप या रस्त्याचा निर्णय झालेला नाही.सभापती असताना रस्त्याचे काम हाती घेतले होते. मात्र त्यासाठी महापालिकेत निधी उपलब्ध झाला नाही. रस्त्याचे मजबुतीकरण, काँक्रिटीकरण, रुंदीकरण यासह रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे यासह मॉडेल रस्ता करण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्यासाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, याबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांनाही निवेदन दिले आहे. -सुवर्णा जाधव, माजी सभापतीआगरकामळा ते आयुर्वेद चौकापर्यंत येण्या-जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधींचे तर या रस्त्याकडे अजिबात लक्ष नाही. याशिवाय महापालिका प्रशासन या रस्त्यांकडे लक्ष देत नाही. महत्वाच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होत नाही की प्रशासन निष्काळजीपणा करते आहे, हेच कळत नाही. काम करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची शहराला खरी गरज आहे. -गीतांजली काळे, माजी उपमहापौरकाटवन खंडोबा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. नऊ मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र सध्या साडेचार फूट रस्ताही उपलब्ध नाही. रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे अत्यंत गरजेचे आहे.-शाकीर शेख, नागरिकरस्ता चांगला होणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी, रुग्णांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास होतो. शहराजवळचा हा सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता मंजूर झाला, तर काम का होत नाही, असा प्रश्न आहे. महापालिकेने चांगला रस्ता तयार करण्यासाठी कार्यवाही करावी.-सिद्धांत जाधव, युवक कार्यकर्ता

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर