शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पारनेर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 16:52 IST

मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले

पारनेर : मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले. मात्र तेथून इतर गावांत वीजपुरवठा जोडलेला नाही. त्यामुळे ते उपकेंद्र सध्या तरी नावालाच ठरले आहे. याशिवाय अळकुटी परिसरातील काही भागातही विजेचा वारंवार लपंडाव सुरू असतो. काही बिघाड झाल्यास दोन ते तीन दिवस दुरुस्ती होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.आमदाराचे नाव : विजय औटीमतदारसंघ : पारनेर-नगरटॉप 5 वचनं1 जलयुक्त शिवार योजना राबवणार2 रस्ते विकासाला प्राधान्य3 वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणणार4 आदिवासींना जमिनी देणार5 वीज पुरवठा सातत्याने मिळणारवचनांचं काय झालं?1 जलयुक्तमधून अनेक बंधारे उभारले2 काही भागात वीज पुरवठ्याचा प्रश्न कायम3 कुकडी पाणी नियोजनात अपयश4 काही आदिवासींना जमीन दिली5 अनेक भागात रस्त्यांची कामे पूर्णहे घडलंय...1 ३२ हजार संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी2 प्रमुख रस्त्यांचे बळकीटकरण3 विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी १५ वीज उपकेंद्र4 आदिवासींना हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या5 मुळा नदीवर पारनेर-राहुरीला जोडणारा पूल उभारलाहे बिघडलंय...1 मतदारसंघात शेतीसाठी शाश्वत पाणी स्त्रोत नाही.2 १६ गावांची पाणी योजना विजबिलाअभावी बंद3 १४ गावांना कालव्याचे नियमित पाणी नाही4 सुपा एमआयडीसीत गुंडागर्दी वाढलीदुष्काळी भागात शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविणे गरजेचे होते. शेती समृद्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल. मतदारसंघात नद्या, ओढे, नाले जोडण्याचा प्रकल्प करायला हवा. -अनिल देठे, नागरिक, पारनेरसुपा एमआयडीसीमध्ये भूमिपुत्रांना नोकºया मिळणे आवश्यक आहे. सध्या युवकांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे आवश्यक होते. दुष्काळामुळे दूध धंदा संकटात सापडल्याने दूध दरासाठी लढा देण्याची गरज होती. -विक्रमसिंह कळमकर,वाडेगव्हाण

विधीमंडळातील कामगिरीविजय औटी यांनी विधीमंडळामध्ये राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या वृद्ध, निराधार, विधवा यांना वेळेवर अनुदान मिळण्यासाठी प्रश्न उपस्थित करून मार्गी लावला. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अत्यावश्यक कायद्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारला भाग पाडले. मागील वर्षी विजय औटी यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यातून त्यांनी मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी आणला.पाच वर्षांत काय केलं?दुष्काळी पारनेर-नगर मतदारसंघात बंधारे बांधून शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न. सर्व रस्त्याचे मजबुतीकरण, ग्रामीण भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जोडून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली. पळशी, तास, वनकुटे भागातील शेतकरी, आदिवासी यांना हक्काची जमीन मिळवून दिली. पारनेर-राहुरी तालुका जोडणाºया मुळा नदीवरील तास येथील पुलाची उभारणी.119 किलोमीटर अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही मतदारसंघातील काही भागातील रस्त्यांची कामे होणे बाकी आहे. काही ठिकाणी खडीकरण झाले आहे, त्याच्या मजबुतीकरणाची मागणी आहे. त्यासाठी अधिकाधिक निधी मिळायला हवा. विशेषत: मतदारसंघात समाविष्ट असलेल्या नगर तालुक्यातील काही भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.मतदार संघाला काय हवं1 कुकडी, पिंपळगाव जोगा पाणी नियोजन2 सुपा एमआयडीसीत भूमिपुत्रांना नोकरी3 दूध संघाचे पुनरूज्जीवन व्हावे4 वीजपुरवठ्यातील अडथळा दूर व्हावाका सुटले नाहीत प्रश्न?कुकडी व पिंपळगाव जोगातून पारनेर तालुक्यातील १४ गावांना कालव्यातून पाणी मिळते, पण जुन्नर तालुक्यातील गावे पाणी घेत असल्याने पारनेरमधील अळकुटी व शेजारील गावांना कमी पाणी पुरवठा होतो. कान्हूर पठार भागाला हक्काचे एक टीएमसी पाणी केवळ निधीअभावी मिळत नाही. पठार भागावर पाणी पोहचविण्यासाठी विजेचा होणारा खर्च लक्षात घेता ही योजना फक्त कागदावरच राहिली.

त्यांना काय वाटतं?मतदारसंघात आपण विकास कामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार योजना राबवून सर्वाधिक बंधारे बांधले. शेततळी उभारली. पाऊस चांगला झाल्यास याचे परिणाम खूप चांगल्या प्रमाणात दिसून येतील. शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले. दुर्गम भागातील रस्ते व मोठे पूल उभारणी करून वंचित घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यातून तेथील शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. - विजय औटी, आमदार

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर