शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पारनेर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 16:52 IST

मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले

पारनेर : मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले. मात्र तेथून इतर गावांत वीजपुरवठा जोडलेला नाही. त्यामुळे ते उपकेंद्र सध्या तरी नावालाच ठरले आहे. याशिवाय अळकुटी परिसरातील काही भागातही विजेचा वारंवार लपंडाव सुरू असतो. काही बिघाड झाल्यास दोन ते तीन दिवस दुरुस्ती होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.आमदाराचे नाव : विजय औटीमतदारसंघ : पारनेर-नगरटॉप 5 वचनं1 जलयुक्त शिवार योजना राबवणार2 रस्ते विकासाला प्राधान्य3 वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणणार4 आदिवासींना जमिनी देणार5 वीज पुरवठा सातत्याने मिळणारवचनांचं काय झालं?1 जलयुक्तमधून अनेक बंधारे उभारले2 काही भागात वीज पुरवठ्याचा प्रश्न कायम3 कुकडी पाणी नियोजनात अपयश4 काही आदिवासींना जमीन दिली5 अनेक भागात रस्त्यांची कामे पूर्णहे घडलंय...1 ३२ हजार संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी2 प्रमुख रस्त्यांचे बळकीटकरण3 विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी १५ वीज उपकेंद्र4 आदिवासींना हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या5 मुळा नदीवर पारनेर-राहुरीला जोडणारा पूल उभारलाहे बिघडलंय...1 मतदारसंघात शेतीसाठी शाश्वत पाणी स्त्रोत नाही.2 १६ गावांची पाणी योजना विजबिलाअभावी बंद3 १४ गावांना कालव्याचे नियमित पाणी नाही4 सुपा एमआयडीसीत गुंडागर्दी वाढलीदुष्काळी भागात शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविणे गरजेचे होते. शेती समृद्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल. मतदारसंघात नद्या, ओढे, नाले जोडण्याचा प्रकल्प करायला हवा. -अनिल देठे, नागरिक, पारनेरसुपा एमआयडीसीमध्ये भूमिपुत्रांना नोकºया मिळणे आवश्यक आहे. सध्या युवकांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे आवश्यक होते. दुष्काळामुळे दूध धंदा संकटात सापडल्याने दूध दरासाठी लढा देण्याची गरज होती. -विक्रमसिंह कळमकर,वाडेगव्हाण

विधीमंडळातील कामगिरीविजय औटी यांनी विधीमंडळामध्ये राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या वृद्ध, निराधार, विधवा यांना वेळेवर अनुदान मिळण्यासाठी प्रश्न उपस्थित करून मार्गी लावला. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अत्यावश्यक कायद्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारला भाग पाडले. मागील वर्षी विजय औटी यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यातून त्यांनी मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी आणला.पाच वर्षांत काय केलं?दुष्काळी पारनेर-नगर मतदारसंघात बंधारे बांधून शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न. सर्व रस्त्याचे मजबुतीकरण, ग्रामीण भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जोडून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली. पळशी, तास, वनकुटे भागातील शेतकरी, आदिवासी यांना हक्काची जमीन मिळवून दिली. पारनेर-राहुरी तालुका जोडणाºया मुळा नदीवरील तास येथील पुलाची उभारणी.119 किलोमीटर अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही मतदारसंघातील काही भागातील रस्त्यांची कामे होणे बाकी आहे. काही ठिकाणी खडीकरण झाले आहे, त्याच्या मजबुतीकरणाची मागणी आहे. त्यासाठी अधिकाधिक निधी मिळायला हवा. विशेषत: मतदारसंघात समाविष्ट असलेल्या नगर तालुक्यातील काही भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.मतदार संघाला काय हवं1 कुकडी, पिंपळगाव जोगा पाणी नियोजन2 सुपा एमआयडीसीत भूमिपुत्रांना नोकरी3 दूध संघाचे पुनरूज्जीवन व्हावे4 वीजपुरवठ्यातील अडथळा दूर व्हावाका सुटले नाहीत प्रश्न?कुकडी व पिंपळगाव जोगातून पारनेर तालुक्यातील १४ गावांना कालव्यातून पाणी मिळते, पण जुन्नर तालुक्यातील गावे पाणी घेत असल्याने पारनेरमधील अळकुटी व शेजारील गावांना कमी पाणी पुरवठा होतो. कान्हूर पठार भागाला हक्काचे एक टीएमसी पाणी केवळ निधीअभावी मिळत नाही. पठार भागावर पाणी पोहचविण्यासाठी विजेचा होणारा खर्च लक्षात घेता ही योजना फक्त कागदावरच राहिली.

त्यांना काय वाटतं?मतदारसंघात आपण विकास कामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार योजना राबवून सर्वाधिक बंधारे बांधले. शेततळी उभारली. पाऊस चांगला झाल्यास याचे परिणाम खूप चांगल्या प्रमाणात दिसून येतील. शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले. दुर्गम भागातील रस्ते व मोठे पूल उभारणी करून वंचित घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यातून तेथील शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. - विजय औटी, आमदार

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर