शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अडीच कोटी खर्चाच्या पुणतांबा-शिंगवे रोडला आठ महिन्यातच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:41 IST

मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे.

कोपरगाव : मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रारही केली. वर्तमानपत्रात वृतही प्रसिद्ध झाले. अद्यापपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.या रस्त्याची कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग माधमातून देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते. सदर रस्त्याचे मागील मार्च महिन्याच्या शेवटी २.५० कोटी खर्च करुन डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर काम हे निकृष्ट दर्जाचे झाले. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम सुरु असताना परिसरातील ग्रामस्थांनी याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावरही टाकले होते. या रस्त्याच्या निवीदेमध्ये काम केल्यानंतर पुढील दोन वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची तरतूद आहे. परंतु रस्त्याचे काम झाल्यापासूनच पडलेल्या खड्ड्यांची आठ महिने उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.या रस्त्याच्या कामासंदर्भात ‘लोकमत’ने दूरध्वनीवरुन संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिका-यांनी प्रतिसाद दिला नाही.

या खड्ड्यांचे काय?

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यातील रस्त्यासंदर्भात सांगितले होते की, येत्या काळात राज्यातील सर्वच रस्त्याची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे सेल्फी काढणा-यांना खड्डेच सापडणार नाहीत. परंतु कोपरगाव तालुक्यात आठ महिन्यापूर्वीच आठ किलोमीटर डांबरीकरण झालेल्या या रस्त्याच्या खड्ड्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावShrirampurश्रीरामपूर