शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन महोत्सव

By admin | Updated: March 26, 2017 14:52 IST

राज्यभरातून आलेल्या २५ मुलींचे कीर्तन, प्रवचन, गायक ऐकण्याची संधी मिळणार आहे.

 किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन महोत्सव

आॅनलाईन लोकमत
अनिल लगड : अहमदनगर 
चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे १६ ते १७ वयोगटांतील किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन, प्रवचन महोत्सव १४ ते २१ मे २०१७ दरम्यान साजरा होत आहे. या महोत्सवात राज्यभरातून आलेल्या २५ मुलींचे कीर्तन, प्रवचन, गायक ऐकण्याची संधी चिचोंडीकरांना मिळणार आहे.
चिचोंडीपाटील बालकीर्तनकार, भागवतकार (वृंदावन) ह.भ.प. लक्ष्मीताई भास्कर खडके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. याबाबत खडके हिने सांगितले की, प. पू. वै. मदन महाराज बिहाणी, ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प. श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या आशीर्वादाने आदिमायाशक्ती मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुकोबारायांच्या प्रमाणानुसार सर्वांना परमार्थिक आनंद व नामामृताचा अनुभव घेता यावा, यासाठी या कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात राज्यभरातील किशोरवयीन मुलींचे कीर्तन, प्रवचन होणार आहे. यात अध्यात्माशिवाय स्त्री-भ्रूणहत्या, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती या विषयांवर प्रबोधन करण्यात येणार आहे. याशिवाय वादक, गायक, टाळकरीही किशोरवयीन मुलीच राहणार आहेत. जवळपास २५ मुलींचा या महोत्सवात ताफा आहे. २१ मे रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. राधाताई सानप महाराज (पाटोदा, जि. बीड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. राज्यात प्रथमच किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा महोत्सव पार पडत असून, याचा चिचोंडी पाटीलसह परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले खडके यांनी केले आहे.
ह.भ.प. सपनाताई साखरे (सोलापूर), नयनाताई साळवे (नाशिक), मोनालीताई गोर्डे (औरंगाबाद), पूजाताई कुटे (नेवासा), ललिताताई ठोंबरे (औरंगाबाद), ज्ञानेश्वरीताई येवले, जामखेड), लक्ष्मीताई खडके (चिचोंडी पाटील, अहमदनगर) यांची कीर्तने होणार आहेत. तर शिवचरित्रावर वैष्णवीताई (राहुरी) यांचे व्याख्यान होणार आहे.
प्रवचनाची जबाबदारी त्रिवेणीताई येवले (जामखेड), साक्षीताई साखरे (सोलापूर), वैष्णवीताई फिसके (अहमदनगर), साक्षीताई वाघ (कोपरगाव), कीर्ती गुंड (आठवड, ता. नगर) यांच्यावर आहे, असे ह.भ. प. लक्ष्मीताई खडके यांनी सांगितले.
मी अत्यंत गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील असून, मला लहानपणापासून अध्यात्माविषयी ओढ होती. आई-वडिलांनी मला यासाठी प्रेरणा दिली. मी वृंदावन, आळंदी येथे अध्यात्माचे धडे घेतले. कीर्तन महोत्सवाच्या आयोजनासाठी मला ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य मिळत आहे, असे भागवताचार्य लक्ष्मीताई खडके यांनी सांगितले़