शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

न्याय, स्वातंत्र्य, समता धोक्यात : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 10:02 IST

सद्यस्थितीत देशातील न्याय, समता, बंधुता, धोक्यात आली आहे़ सामाजिक विद्वेषाचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे़

संगमनेर : सद्यस्थितीत देशातील न्याय, समता, बंधुता, धोक्यात आली आहे़ सामाजिक विद्वेषाचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे़ अल्पसंख्यांकांना गुन्हेगार ठरवले जात आहे़ बहुसंख्यांक गुन्हेगार निर्दोष सुटत आहेत़ हा कसला न्याय आहे? असा परखड सवाल ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केला़अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणारा स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार द्वादशीवार यांना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ तसेच हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंंदे पुरस्कार विलास शिंदे यांना व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार बाजीराव खेमनर यांना प्रदान करण्यात आला़ यावेळी हरियाणाचे खासदार दीपेंदरसिंग हुडा, हिंगोलीचे खासदार राजीव सातव, अल्पसंख्यांक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नदीम जावेद, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते़द्वादशीवार म्हणाले, हा पुरस्कार मी स्वातंत्र्यसैनिकांचा आशीर्वाद घेऊन स्वीकारतो़ मात्र, ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्यसैनिक लढले, ती मूल्येच आज पायदळी तुडविली जात आहेत़ गायींच्यासाठी आज सुरक्षा दिसते़ पण ही सुरक्षा गायींच्यासाठी नाहीच़ मुस्लिमांना डिवचण्यासाठी आहे़ आई, बाईपेक्षा गायी सुरक्षित आहेत़ यातून अल्पसंख्यांकांचा द्वेष हाच हेतू आहे़ ज्या दिवशी या देशातल्या खासदारांनी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पैसे मागितले, त्या दिवशी लोकसभेची इज्जत धुळीस मिळाली़राफेलसारखा घोटाळा दाबून सत्य बोलणाऱ्यांनाच बंद केले जात आहे़ दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचे मारेकरी सरकारला सापडू शकत नाही़ कारण ते त्यांच्याच घरात लपले आहेत़ ते सरकारसाठी वंदनीय आहेत़ मग सरकार त्यांना कसे पकडणार?, असा सवालही त्यांनी केला़माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे हे ग्रामीण विकासाचे शिल्पकार आहेत. भाऊसाहेबांनी सामान्य माणसासाठी सहकार उभा केला. हा सहकार महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशादर्शक आहे. या थोर पुरुषांच्या विचाराचा होणारा जागर नव्या पिढीला स्फुर्ती देणारा आहे.सातव म्हणाले, राजकारणात व समाजकारणात थोरातांनी दिशादर्शक काम केले. मात्र सध्या भाजपा सरकार ग्रामीण भाग, शेतकरी, सहकार मोडीत काढत आहे. शेतकºयांकडे दुर्लक्ष केल्याने देशाची अधोगती होणार आहे.माजी मंत्री थोरात म्हणाले, भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे यांचे विचार पुढच्या पिढींना कळावे म्हणून हा जयंती महोत्सव होत असतो. याप्रसंगी उद्योजक विलास शिंदे, बाजीराव खेमनर, माजी खासदार दादापाटील शेळके, पांडुरंग अभंग, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, करण ससाणे, रावसाहेब शेळके, पंडितराव थोरात, विजय बोºहाडे, उल्हास लाटकर, डॉ. राजीव शिंदे, उत्कर्षा रुपवते, अ‍ॅड.माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, इंद्रजित थोरात, शोभा कडू, रोहिणी देशमुख, शरयु देशमुख, आरती थोरात, रामदास वाघ, सचिन गुजर, किरण पाटील, अजय फटांगरे, शंकर खेमनर, बाबा ओहोळ, निशा कोकणे, प्रा. केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते़द्वादशीवार यांची लेखणी परखड - पाटीलमाजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘द्वादशीवार यांची लेखणी परखड आहे. कानाखाली आवाज काढावा, अशी धार त्यांच्या लेखणीला असते़’ बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘द्वादशीवार यांचे विचार परखड असून, ‘लोकमत’मधील त्यांचे लेखन अत्यंत वस्तुनिष्ठ असते़’थोरात यांनी राज्याचे नेतृत्व करावेखासदार हुडा यांनी थोरात यांचे कौतुक केले. ते म्हणाले, राष्ट्रीय राजकारणात आमदार थोरात हे राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन नक्कीच होणार असून राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आमदार थोरातांकडे आहे. श्रीनिवास पाटील यांनीही थोरातांकडे सर्वजण आशेने पाहत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर