शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

अपहरण करून पत्रकाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:22 IST

राहुरी : पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास राधुजी दातीर यांची अपहरणानंतर हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. त्यांचा ...

राहुरी : पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास राधुजी दातीर यांची अपहरणानंतर हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. त्यांचा मृतदेह मंगळवारी रात्री शहरातील रोटरी ब्लड बँक परिसरात आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दातीर (वय ४८, रा. उंडे वस्ती, राहुरी) हे मंगळवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १२, जेएच ४०६३) राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या घरी जात होते. ते सातपीर बाबा दर्गा ते पाटाच्या दरम्यान असताना स्कॉर्पिओतून आलेल्या अज्ञातांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मल्हारवाडीच्या दिशेने पळवून नेले. यावेळी त्यांची दुचाकी व पायातील चप्पल घटनास्थळी आढळून आली. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाइलवर संपर्क केला असता मोबाइल बंद होता.

पोलिसांना खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके व नीलेशकुमार वाघ हे फौजफाटा घेऊन त्यांचा शोध घेत होते. त्यांची पत्नी सविता दातीर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र दिवसभर त्यांचा काही शोध लागला नव्हता. मंगळवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान त्यांचा मृतदेह राहुरी शहरातील काॅलेज रस्त्याला असलेल्या रोटरी ब्लड बँकेजवळील मोकळ्या प्लाॅटमध्ये आढळून आला.

दातीर यांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात लोकांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा निर्घृणपणे खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच संगमनेर येथील उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, संगमनेर येथील पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, नीलेशकुमार वाघ, नीरज बोकिल, श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक सानप, अहमदनगर येथील श्वानपथक, ठसेतज्ज्ञ असा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. अपहरण करताना वापरण्यात आलेले वाहन कान्हू मोरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

...........

संशयिताना घेतले ताब्यात

पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली. हत्या का करण्यात आली ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

............

हत्येची दुसरी घटना

अगोदर अपहरण व नंतर हत्या असा दुसरा गुन्हा महिनभरातच जिल्ह्यात घडला आहे. गत महिन्यात श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर येथे व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ती घटना ताजी असताना दुसरेही तसेच प्रकरण समोर आले आहे.