शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

आवर्तनाने आणले जेरीस

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे घोड व कुकडी लाभक्षेत्रातील धरणे ओसंडून वाहिली. कुकडी व घोडच्या लाभक्षेत्रात ऊस, फळबागा, भाजीपाला, कपाशीसारखी पिके तरारली. घोडची यापूूर्वी चार आवर्तने सोडण्यात आली. आता कुकडीची तीन आवर्तने सोडण्यात आली. ंं आवर्तनाची टोलवाटोलवीकुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी केली. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर १५ जून रोजी पिण्यासाठी आवर्तन सुटेल असे गाजर दाखविण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कुकडीचे आवर्तन सोडता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट करुन आवर्तनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या दालनात टाकला. कुकडी प्रकल्पातील धरणांमधील खालावलेला पाणीसाठा, पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकमधील पाण्याचे राजकारण व विधानसभा निवडणुकीचे वेध लक्षात घेऊन कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. (तालुका प्रतिनिधी)आवर्तन अशक्यकुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडणे सध्या अशक्य आहे.बबनराव पाचपुते, आमदार, श्रीगोंदाबैल गेला अन्कुकडी व घोडच्या चौथ्या आवर्तनाचा निर्णय एकत्रित घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. वरिष्ठ पातळीवर कोणी बोलत नाही. आता कुकडी, घोडच्या आवर्तनाची ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी अवस्था झाली आहे. - शिवाजीराव नागवडे, ज्येष्ठ नेते, श्रीगोंदाजबाबदार कोण ?कुकडीची चार आवर्तने सोडता येतील, अशी परिस्थिती होती. कुकडीचे पाच टीएमसी पाणी पुणेकरांनी कुठे पळविले? याचा थांगपत्ता लागू दिला नाही. आता शेतकऱ्यांची पिके जळाल्यास कोण नुकसान भरपाई देणार? - बाळासाहेब नाहाटा, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदाहिशोब मिळेल का?आम्ही कुकडीच्या पाण्यासाठी भांडलो. त्यावेळी काही नेत्यांना राजकारण दिसले. कुकडीच्या चौथ्या आवर्तनाचे पाणी कुठे मुरले याचा हिशोब जनतेला मिळेल का? घोडप्रमाणे कुकडी लाभधारकांना केव्हा न्याय मिळणार?- राहुल जगताप, अध्यक्ष, कुकडी साखर कारखाना