शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव, भाजपचा नाद सोडा...

By admin | Updated: April 20, 2016 00:52 IST

पतंगराव कदम यांच्या कानपिचक्या : सांगलीत रस्त्यांच्या कामास प्रारंभ

सांगली : भाजपची मंडळी खूप बिलंदर आहेत. कधी बाद करतील, ते कळणार नाही. म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना भाजपचा नाद सोडण्याचा सल्ला मी दिला आहे. पण, ते सारखे त्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत, हे बरे नव्हे. एक दिवस ते जयंतरावांना नक्की बाद करतील. तुम्ही तरी त्यांना भाजपचा नाद सोडायला सांगा, असा सल्ला माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व संजय बजाज यांना दिला.सांगलीत लोकल बोर्ड कॉलनी ते शासकीय विश्रामधाम रस्ता डांबरीकरण, जाफरी स्ट्रीट ते प्रवीण एसटीडी ६० फुटी रस्ता, लक्ष्मी मंदिर ते चैत्रबन सोसायटी कॉर्नर रस्ता डांबरीकरण व खोजा शिया आशरी जमात व रोटरी क्लब आॅफ विश्रामबाग, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा डॉ. पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील, महापौर हारुणभाई शिकलगार, सभागृह नेते किशोरदादा जामदार, उपमहापौर विजय घाडगे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जयंतरावांना मी अनेक दिवसांपासून भाजपबरोबर संगत वाढवू नका, असा सल्ला दिला होता. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नसल्यामुळे जिल्ह्यात गमती-जमती सुरू आहेत. दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज यांच्याकडे पाहत ते म्हणाले की, अरे मी तुमच्या नेत्यांना सांगून दमलो आहे. जरा जयंतरावांना भाजपचा नाद सोडा म्हणून तुम्ही तरी सांगा. भाजपची मंडळी चांगली नाहीत. गोड गोड बोलतात, पण ते त्यांच्या मनात आहे तेच करतात, असे पतंगराव म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. याचबरोबर महापौरांसह नगरसेवकांना महापालिका क्षेत्रातील पाणी, ड्रेनेज आणि शेरीनाल्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.महापौर शिकलगार म्हणाले, गुंठेवारी भागातील रहिवासी क्षेत्रावर विकास आराखड्यात विविध आरक्षणे आहेत. ही आरक्षणे उठविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. किशोर जामदार म्हणाले की, राजकीय आकसापोटी राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील कामे सुचविण्याचा अधिकार आमदार, खासदारांना दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची कामे केली जात आहेत. हे थांबवावे, अशी मागणी केली. नगरसेविका रोहिणी पाटील यांनी स्वागत, संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)कर्नाटकला : पाणी देण्यास तत्त्वत: मंजुरीकर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे वारणा धरणातून चार टीएमसी पाणी देण्याची मागणी केली आहे. याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत होते. पण, त्यांची समजूत काढून वारणेतून पाणी देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने कर्नाटकला चार टी.एम.सी. पाणी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. याबदल्यात कर्नाटक सरकार सोलापूर, जतला पाणी देण्यास तयार आहे, अशी माहितीही डॉ. कदम यांनी दिली.