शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

जयंतराव, भाजपचा नाद सोडा...

By admin | Updated: April 20, 2016 00:52 IST

पतंगराव कदम यांच्या कानपिचक्या : सांगलीत रस्त्यांच्या कामास प्रारंभ

सांगली : भाजपची मंडळी खूप बिलंदर आहेत. कधी बाद करतील, ते कळणार नाही. म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना भाजपचा नाद सोडण्याचा सल्ला मी दिला आहे. पण, ते सारखे त्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत, हे बरे नव्हे. एक दिवस ते जयंतरावांना नक्की बाद करतील. तुम्ही तरी त्यांना भाजपचा नाद सोडायला सांगा, असा सल्ला माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व संजय बजाज यांना दिला.सांगलीत लोकल बोर्ड कॉलनी ते शासकीय विश्रामधाम रस्ता डांबरीकरण, जाफरी स्ट्रीट ते प्रवीण एसटीडी ६० फुटी रस्ता, लक्ष्मी मंदिर ते चैत्रबन सोसायटी कॉर्नर रस्ता डांबरीकरण व खोजा शिया आशरी जमात व रोटरी क्लब आॅफ विश्रामबाग, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा डॉ. पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील, महापौर हारुणभाई शिकलगार, सभागृह नेते किशोरदादा जामदार, उपमहापौर विजय घाडगे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जयंतरावांना मी अनेक दिवसांपासून भाजपबरोबर संगत वाढवू नका, असा सल्ला दिला होता. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नसल्यामुळे जिल्ह्यात गमती-जमती सुरू आहेत. दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज यांच्याकडे पाहत ते म्हणाले की, अरे मी तुमच्या नेत्यांना सांगून दमलो आहे. जरा जयंतरावांना भाजपचा नाद सोडा म्हणून तुम्ही तरी सांगा. भाजपची मंडळी चांगली नाहीत. गोड गोड बोलतात, पण ते त्यांच्या मनात आहे तेच करतात, असे पतंगराव म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. याचबरोबर महापौरांसह नगरसेवकांना महापालिका क्षेत्रातील पाणी, ड्रेनेज आणि शेरीनाल्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.महापौर शिकलगार म्हणाले, गुंठेवारी भागातील रहिवासी क्षेत्रावर विकास आराखड्यात विविध आरक्षणे आहेत. ही आरक्षणे उठविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. किशोर जामदार म्हणाले की, राजकीय आकसापोटी राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील कामे सुचविण्याचा अधिकार आमदार, खासदारांना दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची कामे केली जात आहेत. हे थांबवावे, अशी मागणी केली. नगरसेविका रोहिणी पाटील यांनी स्वागत, संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)कर्नाटकला : पाणी देण्यास तत्त्वत: मंजुरीकर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे वारणा धरणातून चार टीएमसी पाणी देण्याची मागणी केली आहे. याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत होते. पण, त्यांची समजूत काढून वारणेतून पाणी देण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने कर्नाटकला चार टी.एम.सी. पाणी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. याबदल्यात कर्नाटक सरकार सोलापूर, जतला पाणी देण्यास तयार आहे, अशी माहितीही डॉ. कदम यांनी दिली.