शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

ज्वारी करपू लागली

By admin | Updated: October 5, 2014 23:56 IST

अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत.

अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत. पाऊस आणखीन काही दिवस लांबल्यास रब्बी हंगामाची अवस्था खरिपाप्रमाणे होण्याची शक्यता आहे. नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साडे सात लाख हेक्टर हंगामाचे क्षेत्र असून त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ५ लाख २० हजारांच्या जवळपास आहे. सध्या यातून १ लाख ९९ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून साधारण महिनाभरापासून पाऊस लांबल्याने पेरलेली ही ज्वारी आता करपू लागली आहे. आॅक्टोबर हिटचा तडाखा सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हाळामुळे पिके सुकू लागली असून त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. रब्बी हंगामाचा कालावधी हा १५ आॅगस्ट ते १९ नोव्हेंबर असा आहे. या काळात तीन टप्प्यात ज्वारीची पेरणी होते. गोकुळष्टमी, श्रावणी पोळा आणि त्यानंतर काही भागात ज्वारी पेरली जाते. सर्वात उशिरा ज्वारीची पेरणी जामखेड तालुक्यात होते.जिल्ह्यात दीड महिन्यांत १ लाख ९९ हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली असून त्यासोबत मका ४ हजार २७३, हरभरा ६६७, करडई ३२५ या पिकांची पेरणी झालेली आहे. या पेरणीची टक्केवारी २५ टक्के आहे. परतीच्या पावसावर हंगामातील अन्य पिकांच्या पेरण्या अवलंबून आहेत. साधारण दिवाळीनंतर गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या पेरणीला सुरूवात होते. या पेरण्या नोव्हेंबर अखेर सुरू असतात. बागायत भागात पाटपाण्याच्या जोरावर गहू, हरभरा पिके घेतली जात आहेत. परतीचा पाऊस न झाल्यास हंगामातील अन्य पिकांच्या पेरणीवर त्याचा परिणाम होणार असून वाढ अवस्थेत असणाऱ्या ज्वारीला त्याचा फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)