शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ज्वारी करपू लागली

By admin | Updated: October 5, 2014 23:56 IST

अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत.

अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत. पाऊस आणखीन काही दिवस लांबल्यास रब्बी हंगामाची अवस्था खरिपाप्रमाणे होण्याची शक्यता आहे. नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साडे सात लाख हेक्टर हंगामाचे क्षेत्र असून त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ५ लाख २० हजारांच्या जवळपास आहे. सध्या यातून १ लाख ९९ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून साधारण महिनाभरापासून पाऊस लांबल्याने पेरलेली ही ज्वारी आता करपू लागली आहे. आॅक्टोबर हिटचा तडाखा सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हाळामुळे पिके सुकू लागली असून त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. रब्बी हंगामाचा कालावधी हा १५ आॅगस्ट ते १९ नोव्हेंबर असा आहे. या काळात तीन टप्प्यात ज्वारीची पेरणी होते. गोकुळष्टमी, श्रावणी पोळा आणि त्यानंतर काही भागात ज्वारी पेरली जाते. सर्वात उशिरा ज्वारीची पेरणी जामखेड तालुक्यात होते.जिल्ह्यात दीड महिन्यांत १ लाख ९९ हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली असून त्यासोबत मका ४ हजार २७३, हरभरा ६६७, करडई ३२५ या पिकांची पेरणी झालेली आहे. या पेरणीची टक्केवारी २५ टक्के आहे. परतीच्या पावसावर हंगामातील अन्य पिकांच्या पेरण्या अवलंबून आहेत. साधारण दिवाळीनंतर गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या पेरणीला सुरूवात होते. या पेरण्या नोव्हेंबर अखेर सुरू असतात. बागायत भागात पाटपाण्याच्या जोरावर गहू, हरभरा पिके घेतली जात आहेत. परतीचा पाऊस न झाल्यास हंगामातील अन्य पिकांच्या पेरणीवर त्याचा परिणाम होणार असून वाढ अवस्थेत असणाऱ्या ज्वारीला त्याचा फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)