शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

ज्वारी करपू लागली

By admin | Updated: October 5, 2014 23:56 IST

अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत.

अहमदनगर : परतीच्या पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामात पेरलेली पिके करपू लागली आहेत. पाऊस आणखीन काही दिवस लांबल्यास रब्बी हंगामाची अवस्था खरिपाप्रमाणे होण्याची शक्यता आहे. नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साडे सात लाख हेक्टर हंगामाचे क्षेत्र असून त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ५ लाख २० हजारांच्या जवळपास आहे. सध्या यातून १ लाख ९९ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून साधारण महिनाभरापासून पाऊस लांबल्याने पेरलेली ही ज्वारी आता करपू लागली आहे. आॅक्टोबर हिटचा तडाखा सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हाळामुळे पिके सुकू लागली असून त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. रब्बी हंगामाचा कालावधी हा १५ आॅगस्ट ते १९ नोव्हेंबर असा आहे. या काळात तीन टप्प्यात ज्वारीची पेरणी होते. गोकुळष्टमी, श्रावणी पोळा आणि त्यानंतर काही भागात ज्वारी पेरली जाते. सर्वात उशिरा ज्वारीची पेरणी जामखेड तालुक्यात होते.जिल्ह्यात दीड महिन्यांत १ लाख ९९ हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली असून त्यासोबत मका ४ हजार २७३, हरभरा ६६७, करडई ३२५ या पिकांची पेरणी झालेली आहे. या पेरणीची टक्केवारी २५ टक्के आहे. परतीच्या पावसावर हंगामातील अन्य पिकांच्या पेरण्या अवलंबून आहेत. साधारण दिवाळीनंतर गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या पेरणीला सुरूवात होते. या पेरण्या नोव्हेंबर अखेर सुरू असतात. बागायत भागात पाटपाण्याच्या जोरावर गहू, हरभरा पिके घेतली जात आहेत. परतीचा पाऊस न झाल्यास हंगामातील अन्य पिकांच्या पेरणीवर त्याचा परिणाम होणार असून वाढ अवस्थेत असणाऱ्या ज्वारीला त्याचा फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)