शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जामखेड-श्रीगोंदा रस्ता बनला अपघातसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 15:20 IST

तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

सत्तार शेखहळगाव : तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. सातत्याने होणा-या अपघातांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती हाती घेण्याची मागणी वाहनधारकांसह जनतेतून होत आहे.पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाºया मुख्य रस्त्यांपैकी जामखेड-श्रीगोंदा हा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता दुपदरी करण्याची अनेक वर्षांची मागणी सरकारी दरबारी प्रलंबित आहे. निवडणूक काळातही हा मुद्दा चर्चेत असतो. पण नंतर हा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवला जातो. या कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न निकाली निघण्याची आशा या भागात निर्माण झाली होती. त्यानुसार हा रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग म्हणून या रस्त्याचे काम अजूनपर्यंत होऊ शकलेले नाही.जामखेड तालुक्यातील पाटोदा-अरणगाव या भागातून जाणाºया जामखेड-श्रीगोंदा या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. एका ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध अक्षरश: तीन फुटांपेक्षा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय रत्नापूर फाटा ते अरणगावपर्यंत रस्त्याला साईडपट्टीच दिसत नाही. साईडपट्टीचा भाग दोन दोन फुटांच्या खड्ड्यांनी व्यापला आहे. साईडपट्टीला असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला घेत नाहीत. यातूनच वाहनधारकांमध्ये हमरीतुमरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कंबरदुखी, मानदुखीने अनेक प्रवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर