शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जामखेड-श्रीगोंदा रस्ता बनला अपघातसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 15:20 IST

तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

सत्तार शेखहळगाव : तालुक्यातील अरणगाव परिसरातून जाणाऱ्या जामखेड-श्रीगोंदा या मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. सातत्याने होणा-या अपघातांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती हाती घेण्याची मागणी वाहनधारकांसह जनतेतून होत आहे.पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाºया मुख्य रस्त्यांपैकी जामखेड-श्रीगोंदा हा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता दुपदरी करण्याची अनेक वर्षांची मागणी सरकारी दरबारी प्रलंबित आहे. निवडणूक काळातही हा मुद्दा चर्चेत असतो. पण नंतर हा प्रश्न बासनात गुंडाळून ठेवला जातो. या कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न निकाली निघण्याची आशा या भागात निर्माण झाली होती. त्यानुसार हा रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग म्हणून या रस्त्याचे काम अजूनपर्यंत होऊ शकलेले नाही.जामखेड तालुक्यातील पाटोदा-अरणगाव या भागातून जाणाºया जामखेड-श्रीगोंदा या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. एका ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध अक्षरश: तीन फुटांपेक्षा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय रत्नापूर फाटा ते अरणगावपर्यंत रस्त्याला साईडपट्टीच दिसत नाही. साईडपट्टीचा भाग दोन दोन फुटांच्या खड्ड्यांनी व्यापला आहे. साईडपट्टीला असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला घेत नाहीत. यातूनच वाहनधारकांमध्ये हमरीतुमरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कंबरदुखी, मानदुखीने अनेक प्रवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर