शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जलयुक्त अभियान हीच सर्वोच्च प्राथमिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:48 IST

जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज व्यक्त केला.

ठळक मुद्देद्विवेदी यांनी जिल्हाधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली अधिकाऱ्यांसह पहिलीच बैठक

अहमदनगर : जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज व्यक्त केला.प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडून द्विवेदी यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर लगेचच त्यांनी महसूल अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक संवाद साधत द्विवेदी यांनी अधिका-यांकडून जिल्ह्याविषयी माहिती घेतली.जिल्हा आकारमानाने मोठा असल्याने प्रत्येकाशी समन्वय ठेवून वेगाने काम मार्गी लावण्यावर आपला भर राहणार आहे. त्यादृष्टीने गावपातळीवर काम करणा-या शासकीय घटकांशी थेट संपर्क ठेवून तेथील कामे जलदगतीने मार्गी लागतील, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी अधिका-यांना दिला.शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने असा समन्वय प्रस्थापित करण्यावर आपला भर राहिल, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी अपर जिल्हाधिकारी पालवे, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामनराव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी एन. एस. भदाणे, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, गणेश मरकड, शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी