शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 15:23 IST

जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

अहमदनगर : जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिला आहे. परंतु त्यानंतर नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलनास सुरूवात झाली. अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी जायकवाडीस पाणी सोडल्यास आपण प्रवरा पात्रात जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला असून प्रवरा नदीवरील पुलावर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे.त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग, पोलीस यंत्रणा यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सकाळी बैठक झाली. ही सर्व स्थिती पाहता जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभाग यांच्याकडून यास दुजोरा देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJayakwadi Damजायकवाडी धरण