शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भातरोपासाठी राब जाळणे पध्दत बंद होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST

मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ...

मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ज्या ठिकाणी भातरोपे तयार करतात ती शेतातील जमीन भाजून जागा तयार करणे होय. जंगलातील झाडांचा पालापाचोळा आणि शेणाच्या गोवऱ्या, पावट्या जाळून रोप टाकण्यासाठी जागा तयार केली जाते.

या पारंपरिक पध्दतीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. राबच्या नावाखाली झाडे नष्ट होत आहेत. जागा भाजल्यामुळे तेथील जमिनीतील पोषक सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. जागा भाजल्यावर त्या जागी बियांचा उतारा उत्तम होतो हा समज चुकीचा आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढविणारे सर्व घटक, जे पालापाचोळा व शेणाच्या पावट्या यातून मिळतात ते नष्ट होतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

दरवर्षी हजारो टन बायोमासही जाळला जातो. त्यातून उठणारे धुरांचे लोट कार्बन उत्सर्जित करतात. हे जैव विविधतेला घातक ठरत आहे. पालापाचोळा, शेणखत यातून मिळणारे कंपोस्ट खत या प्रक्रियेत जळून नष्ट होते.

............

जनजागृतीची गरज

पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी भात रोपे गादीवाफा पद्धतीने तयार करण्याची शिफारस केली आहे. ही अतिशय सोपी व उपयुक्त पद्धत आहे. यासाठी एक फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे व सोयीनुसार लांब गादीवाफे तयार करून त्यावर शेणखत, गांडूळ खत, सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड ही खते एकत्र करून त्यावर भाताचे बियाणे खुरप्याच्या साह्याने रेघा पाडून टाकावे. त्यामुळे तजेलदार भातरोप तयार होते. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

.................

फोटो आहे