शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भातरोपासाठी राब जाळणे पध्दत बंद होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST

मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ...

मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ज्या ठिकाणी भातरोपे तयार करतात ती शेतातील जमीन भाजून जागा तयार करणे होय. जंगलातील झाडांचा पालापाचोळा आणि शेणाच्या गोवऱ्या, पावट्या जाळून रोप टाकण्यासाठी जागा तयार केली जाते.

या पारंपरिक पध्दतीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. राबच्या नावाखाली झाडे नष्ट होत आहेत. जागा भाजल्यामुळे तेथील जमिनीतील पोषक सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. जागा भाजल्यावर त्या जागी बियांचा उतारा उत्तम होतो हा समज चुकीचा आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढविणारे सर्व घटक, जे पालापाचोळा व शेणाच्या पावट्या यातून मिळतात ते नष्ट होतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

दरवर्षी हजारो टन बायोमासही जाळला जातो. त्यातून उठणारे धुरांचे लोट कार्बन उत्सर्जित करतात. हे जैव विविधतेला घातक ठरत आहे. पालापाचोळा, शेणखत यातून मिळणारे कंपोस्ट खत या प्रक्रियेत जळून नष्ट होते.

............

जनजागृतीची गरज

पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी भात रोपे गादीवाफा पद्धतीने तयार करण्याची शिफारस केली आहे. ही अतिशय सोपी व उपयुक्त पद्धत आहे. यासाठी एक फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे व सोयीनुसार लांब गादीवाफे तयार करून त्यावर शेणखत, गांडूळ खत, सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड ही खते एकत्र करून त्यावर भाताचे बियाणे खुरप्याच्या साह्याने रेघा पाडून टाकावे. त्यामुळे तजेलदार भातरोप तयार होते. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

.................

फोटो आहे