शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

भातरोपासाठी राब जाळणे पध्दत बंद होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST

मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ...

मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ज्या ठिकाणी भातरोपे तयार करतात ती शेतातील जमीन भाजून जागा तयार करणे होय. जंगलातील झाडांचा पालापाचोळा आणि शेणाच्या गोवऱ्या, पावट्या जाळून रोप टाकण्यासाठी जागा तयार केली जाते.

या पारंपरिक पध्दतीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. राबच्या नावाखाली झाडे नष्ट होत आहेत. जागा भाजल्यामुळे तेथील जमिनीतील पोषक सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. जागा भाजल्यावर त्या जागी बियांचा उतारा उत्तम होतो हा समज चुकीचा आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढविणारे सर्व घटक, जे पालापाचोळा व शेणाच्या पावट्या यातून मिळतात ते नष्ट होतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

दरवर्षी हजारो टन बायोमासही जाळला जातो. त्यातून उठणारे धुरांचे लोट कार्बन उत्सर्जित करतात. हे जैव विविधतेला घातक ठरत आहे. पालापाचोळा, शेणखत यातून मिळणारे कंपोस्ट खत या प्रक्रियेत जळून नष्ट होते.

............

जनजागृतीची गरज

पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी भात रोपे गादीवाफा पद्धतीने तयार करण्याची शिफारस केली आहे. ही अतिशय सोपी व उपयुक्त पद्धत आहे. यासाठी एक फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे व सोयीनुसार लांब गादीवाफे तयार करून त्यावर शेणखत, गांडूळ खत, सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड ही खते एकत्र करून त्यावर भाताचे बियाणे खुरप्याच्या साह्याने रेघा पाडून टाकावे. त्यामुळे तजेलदार भातरोप तयार होते. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

.................

फोटो आहे