शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

कृषी कायद्यांवरील समितीचा अहवाल दडपून ठेवणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST

अहमदनगर : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव ठाण मांडून असताना अभ्यास समितीचा अहवाल एवढ्या दिवस दडपून ठेवणे योग्य होणार नाही. ...

अहमदनगर : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव ठाण मांडून असताना अभ्यास समितीचा अहवाल एवढ्या दिवस दडपून ठेवणे योग्य होणार नाही. हा अहवाल तातडीने सार्वजनिक करून त्यावर चर्चा करावी. चर्चेतून जो निष्कर्ष निघेल त्याची अंमलबजवणी करावी, अशा आशयाचे पत्र समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पाठविले आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते तीन कायद्यांना स्थगिती देऊन त्यावर अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे. मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यावर बोलताना शेतकरी नेते तथा समितीचे सदस्य घनवट म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत. त्यावर तोडगा निघावा, यासाठी सर्वेाच्च न्यायालयाने स्वत:हून चार सदस्यांची अभ्यास समिती नियुक्त केली. या समितीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन महिने अभ्यास केला. गेल्या १९ मार्च २०२१ रोजी अहवाल समितीने सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. अहवाल सादर करून पाच महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला. शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला गेला नाही. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची निकड लक्षात घेऊन न्यायालयाने अहवाल केंद्र सरकारला सादर करावा. तसेच अहवाल चर्चेसाठी सार्वजनिक करावा. देशात अनेक तज्ज्ञ आहेत. ते या अहवालावर चर्चा करतील. चर्चेतून जो निष्कर्ष निघेल, त्यानुसार कायदे तयार करून ते पारित करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील.

.....

शेतीबाबत योग्य धोरण ठरवावे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशातील विविध संघटना, तज्ज्ञांची मते समितीने जाणून घेतले. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अहवाल तयार केला असून, त्यावर खुली चर्चा व्हावी. समितीच्या अहवालाचा अभ्यास करून शेतीबाबत योग्य धोरण ठरावे, अशीही मागणी घनवट यांच्याकडून करण्यात आली आहे.