शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

नगर जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल याची तारीख सांगणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:59 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा ३१ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढतच गेली.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा ३१ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढतच गेली. कोरोनामुक्त होण्याऐवजी जिल्ह्याचा आकडा सव्वा दोनशेच्या पुढे सरकला. त्यामुळे जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल, याचा मुहुर्त सांगणे कठीण आहे, अशी कबुली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांचे हे वाक्य ऐकून जिल्हाधिकाºयांसह उपस्थित अधिकाºयांची चिंता वाढली.पालकमंत्री मुश्रिफ यांनी आपणच केलेल्या घोषणेची आठवण झाली. पत्रकारांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांनी हा खुलासा सुरवातीलाच करून टाकला. लॉकडाऊन उघडल्यानंतर रस्त्यावर मोठी गर्दी होते आहे. भाजीपाला खरेदीसाठी लोकांची उडी पडते आहे. काही लोक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते आहे. ही सर्व परिस्थितीचे मुश्रीफ यांनी अवलोकन केले असावे. म्हणून तेही हतबल झाल्याचे पहायला मिळाले.जिल्हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील आकडा दोनशेपार गेला. अधिकाºयांनी प्रयत्न केले, मात्र त्याला दृष्ट लागली. लोक बाहेरून येत राहिले आणि कोरोनाची संख्या वाढत गेली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आता तारीख सांगणे अवघड आहे. मात्र लवकरात लवकर जिल्हा कोरोनामुक्त होईल, हे आता सांगतो, असे मुश्रीफ म्हणाले.जिल्ह्यात आतापर्यंत २३२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील १६१ जण घरी परतले आहेत. मृत्यू झाले हे दुर्दैव आहे. आता येथून पुढे एकही मृत्यू होणार नाही, याची प्रशासनाला काळजी घ्यायची आहे.  कोणाला लक्षणे नसतील तर तपासणीची गरज नाही. मात्र ज्यांना लक्षणे आहेत, त्यांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. परगावाहून आलेल्या ३३ हजार २९९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता फक्त ६ हजार ९६३ जण क्वारंटाईन आहेत. लस मिळेपर्यंत स्थिती पूर्ववत होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे.जे गोरगरीब आहेत, त्यांना धान्य देण्याची योजना सरकारने आणली आहे. महिनाभरात त्यांना धान्य दिले जाईल. कधी डाळ, तर कधी  चणा देण्याचे काम सुरू होईल, रेशनकार्ड ज्यांना नाही, अशानांही धान्य देण्याचे नियोजन आहे.----------प्रशासनात समन्वयाचा अभावसंगमनेरमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोनाने तीन महिलांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र जिल्हा प्रशासनाकडून दोन महिलांची मृत्यू झाल्याची माहिती दिली जात होती. अशावेळी संभ्रम तयार होतो. याबाबत प्रशासनाचा असमन्वय दिसतो, असे पत्रकारांनी छेडल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: पुढे येत उत्तर दिले. तिसरी महिला थेट मुंबई येथून जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यामुळे त्या महिलेचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे तीनच महिलांची माहिती दिली जात होती, असे सांगितले.