शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे़ दलीत कुटुंबीयांच्या हत्येची नगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे़

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे़ दलीत कुटुंबीयांच्या हत्येची नगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे़ दलितांची हत्या करणाऱ्या नराधमांना पोलीस पकडणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित करत खा़ रामदास आठवले यांनी दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करू, असा इशारा सोमवारी मोर्चाव्दारे दिला़जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ विविध दलित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व खा़ आठवले यांनी केले़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले़ त्यावेळी आठवले बोलत होते़ संघटनेचे श्रीकांत भालेराव, हनुमान साठे, अमर कजबे, गौतम सोनावणे, अशोक गायकवाड, भिमशक्तीचे नाथा अल्हाट, बहुजन सम्राटसेनेचे संजय कांबळे, मृतांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते़ आठवले यांनी पोलीस प्रशासनावर सडकून टीका केली़ ते म्हणाले, जवखेडे येथील दलीत कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ सात दिवस उलटून देखील या घटनेचा तपास लागत नाही़ अत्यंत हलाखीचे जीवन जाधव कुटुंबीय जगत होते़ बाजरीची काढणी करण्यासाठी गेलेल्या दलित कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून, या घटनेचा येत्या दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी आठवले यांनी दिला़दलित संघटना कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत, असा खुलासा करत खा़ आठवले यांनी हत्येचे कारण कोणतेही असो पोलिसांनी त्याचा तपास करून तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी़ ते कोणत्याही समाजाचे असो, त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही़ परंतु पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याने दलित संघटना पोलीस प्रशासनाचा निषेध करत असून, दोन दिवसांत पोलिसांनी घटनेचा तपास लावावा, अन्यथा गुरुवापासून दलित संघटनांच्यातीने जिल्हा बंद करण्यात येईल, असे सांगून आठवले यांनी बंद म्हणजे बंदच, असा इशारा दिला़ बंदसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे़ बंदमध्ये सहभागी होऊन जाधव कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आठवले यांनी केले़ (प्रतिनिधी)