शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे़ दलीत कुटुंबीयांच्या हत्येची नगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे़

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे़ दलीत कुटुंबीयांच्या हत्येची नगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे़ दलितांची हत्या करणाऱ्या नराधमांना पोलीस पकडणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित करत खा़ रामदास आठवले यांनी दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करू, असा इशारा सोमवारी मोर्चाव्दारे दिला़जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ विविध दलित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व खा़ आठवले यांनी केले़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले़ त्यावेळी आठवले बोलत होते़ संघटनेचे श्रीकांत भालेराव, हनुमान साठे, अमर कजबे, गौतम सोनावणे, अशोक गायकवाड, भिमशक्तीचे नाथा अल्हाट, बहुजन सम्राटसेनेचे संजय कांबळे, मृतांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते़ आठवले यांनी पोलीस प्रशासनावर सडकून टीका केली़ ते म्हणाले, जवखेडे येथील दलीत कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ सात दिवस उलटून देखील या घटनेचा तपास लागत नाही़ अत्यंत हलाखीचे जीवन जाधव कुटुंबीय जगत होते़ बाजरीची काढणी करण्यासाठी गेलेल्या दलित कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून, या घटनेचा येत्या दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी आठवले यांनी दिला़दलित संघटना कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत, असा खुलासा करत खा़ आठवले यांनी हत्येचे कारण कोणतेही असो पोलिसांनी त्याचा तपास करून तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी़ ते कोणत्याही समाजाचे असो, त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही़ परंतु पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याने दलित संघटना पोलीस प्रशासनाचा निषेध करत असून, दोन दिवसांत पोलिसांनी घटनेचा तपास लावावा, अन्यथा गुरुवापासून दलित संघटनांच्यातीने जिल्हा बंद करण्यात येईल, असे सांगून आठवले यांनी बंद म्हणजे बंदच, असा इशारा दिला़ बंदसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे़ बंदमध्ये सहभागी होऊन जाधव कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आठवले यांनी केले़ (प्रतिनिधी)