शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे़ दलीत कुटुंबीयांच्या हत्येची नगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे़

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे़ दलीत कुटुंबीयांच्या हत्येची नगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे़ दलितांची हत्या करणाऱ्या नराधमांना पोलीस पकडणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित करत खा़ रामदास आठवले यांनी दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करू, असा इशारा सोमवारी मोर्चाव्दारे दिला़जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ विविध दलित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व खा़ आठवले यांनी केले़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले़ त्यावेळी आठवले बोलत होते़ संघटनेचे श्रीकांत भालेराव, हनुमान साठे, अमर कजबे, गौतम सोनावणे, अशोक गायकवाड, भिमशक्तीचे नाथा अल्हाट, बहुजन सम्राटसेनेचे संजय कांबळे, मृतांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते़ आठवले यांनी पोलीस प्रशासनावर सडकून टीका केली़ ते म्हणाले, जवखेडे येथील दलीत कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ सात दिवस उलटून देखील या घटनेचा तपास लागत नाही़ अत्यंत हलाखीचे जीवन जाधव कुटुंबीय जगत होते़ बाजरीची काढणी करण्यासाठी गेलेल्या दलित कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून, या घटनेचा येत्या दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी आठवले यांनी दिला़दलित संघटना कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत, असा खुलासा करत खा़ आठवले यांनी हत्येचे कारण कोणतेही असो पोलिसांनी त्याचा तपास करून तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी़ ते कोणत्याही समाजाचे असो, त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही़ परंतु पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याने दलित संघटना पोलीस प्रशासनाचा निषेध करत असून, दोन दिवसांत पोलिसांनी घटनेचा तपास लावावा, अन्यथा गुरुवापासून दलित संघटनांच्यातीने जिल्हा बंद करण्यात येईल, असे सांगून आठवले यांनी बंद म्हणजे बंदच, असा इशारा दिला़ बंदसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे़ बंदमध्ये सहभागी होऊन जाधव कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आठवले यांनी केले़ (प्रतिनिधी)