शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

अहमदनगर जिल्हा बँक भरतीची निपक्षपातीपणे चौकशी करा; राष्ट्रवादीसह, भाजप, सेनाही चौकशीवर नाराज, काँग्रेसकडून प्रतिक्रियाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:05 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या भरतीतील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ गत तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. बँकेच्या संचालक मंडळाने याबाबत मौन धारण केले आहे. मात्र, जनतेतून याबाबत नाराजी वाढत असून अनेकांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे, वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अरुण जाधव यांनी सहकार सचिव व आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनीही ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना भरतीच्या चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी मात्र वरिष्ठांशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.

जिल्हा बँंक भरतीची निपक्षपातीपणे व योग्य एजन्सीकडून चौकशी होणे आवश्यक आहे. ही शेतक-यांची व नावाजलेली बँक आहे. तेथे काहीही गालबोट लागता कामा नये. तत्कालीन सहकार आयुक्त व इतर अधिकाºयांनी भरतीबाबत योग्य निर्णय घेतले आहेत का? ‘नायबर’ या संस्थेने भरतीचे नियम पाळले आहेत का? न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी झाली आहे का? या सर्व बाबींची तपासणी व्हावी. भरतीत गैरव्यवहार झाला असेल तर तो समोर यायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस कधीही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. 

न्यायालयाच्या निर्णयानंतर भरतीतील संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीकडून तपासून का घेतल्या ही बाब शंकास्पद आहे. फेरचौकशीत संशयित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपींची तपासणी झाली नाही ही बाब ‘लोकमत’ने समोर आणली आहे. ही तपासणी का झाली नाही हेही आक्षेपार्ह आहे. त्यामुळे योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. सहकार हा सामान्य जनतेच्या हितासाठी आहे. या संस्थांमध्ये गैरकारभार होत असेल तर ते चूक आहे. सहकारी संस्थांवर सामान्य कुटुंबातील लोक येत नाहीत, तोवर असे प्रकार थांबणार नाहीत, असे भाजपचे उतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले. 

जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत गैरव्यवहार झाले असतील तर त्याची निश्चित चौकशी झाली पाहिजे़ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी़ वेळप्रसंगी सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल़, असे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्र