शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोरगरिबांना अन्नधान्यापासून वंचित ठेवण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST

श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अन्न, नागरी, पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिका शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या ...

श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अन्न, नागरी, पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिका शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नाही असे हमीपत्र त्यात लिहून घेतले जात आहे. गोरगरिबांना अन्नधान्यापासून वंचित ठेवण्याचा हा केंद्राचा डाव असल्याचा आरोप आमदार लहू कानडे यांनी केला आहे.

शिधापत्रिकाधारकांकडून निवासाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वाहन परवाना, आधार कार्ड यापैकी एक वर्षाच्या आतील पुरावे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय शिधापत्रिका तपासणी नमुना म्हणून एक अजब हमीपत्र भरून घेतले जात आहे. त्यात शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नाही. भविष्यात गॅस जोडणी घेतल्यास त्याची माहिती तत्काळ शिधावाटप कार्यालयास देण्यास बंधनकारक राहील. तसे न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल याची जाणीव आहे, असा मथळा लिहून घेतला जात आहे. या हमीपत्रावर कुटुंबप्रमुखाची सही असते, अशी माहिती आमदार कानडे यांनी दिली.

आतापर्यंत राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र व आस्थापना कार्ड अशा सर्व प्रकारच्या देण्यात येत आहेत. यामध्ये मुख्यतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी पिवळी शिधापत्रिका, रुपये एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी केशरी शिधापत्रिका आणि इतर सर्वांसाठी शुभ्र शिधापत्रिका देण्यात येते. शिधापत्रिका तपासणी मोहीम ही सार्वजनिक वितरण व्यवस्था ( नियंत्रण आदेश) २०१५ नुसार निरंतर प्रक्रिया आहे. मात्र केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यावेळेस गॅस जोडणी बाबतचे लेखी हमीपत्र घेऊन गोरगरीब माणसांच्या शिधापत्रिका कोणत्याही क्षणी रद्द करून त्याला कायमचे अन्नधान्यापासून वंचित करण्याचा डाव आहे, अशी टीका कानडे यांनी केली आहे.

...

ठाकरे, भुजबळ यांना पत्र

केंद्राने २८ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेले परिपत्रक तत्काळ मागे घ्यावे यासाठी आमदार लहू कानडे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र पाठविले आहे.

..

गरिबांच्या तोंडचा घास हिरावणार?

पंतप्रधान मोदी सरकारने गोरगरीब महिलांना उज्ज्वला गॅस दिल्याची व त्या अंतर्गत आठ कोटी कुटुंब लाभान्वित केल्याची मोठी जाहिरात केली आहे. आता मात्र एक सिलिंडर देऊन कायमस्वरूपी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा त्यामागे कुटील हेतू तर नाही ना? अशी शंका कानडे यांनी उपस्थित केली आहे.